02:37am | Mar 10, 2019 |
वाई : मदनदादांच्या प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकत वाढली आहे. नवभारत निर्मितीचा ध्यास घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली परिवर्तनाच्या लढाईत मदनदादांसारखे कर्तृत्ववान सेनापती मिळाल्याने महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली आहे. दादांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे पक्षात मोठे स्थान दिले जाईल, असे ठोस आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान वीर परिवार हा बहुस्पृत भाजप परिवारात सामील झाल्याने किसन वीर ची प्रगती अधिक पटीने होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान यावेळी मदनदादा भोसले यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
किसनवीर सह. साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या तिसर्या डिस्टलरी प्रकल्पाचे उदघाटन, अमर जवान स्मारकाचे भूमिपूजन व उमर जवान उद्यानातील वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर, कांताताई नलावडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, जेष्ठ नेते शंकरराव गाढवे, माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे, गिरीश कुबेर, गजानन बाबर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आमचे परममित्र, मोठे बंधू व भावी आमदार असा उल्लेख करून भाजपमध्ये मदनदादा यांनी प्रवेश केल्याबद्दल मनस्वी आनंद झाल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, तिसर्या डिस्टिलरी प्रकल्पामुळे किसनवीर कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. शेतकरी, सभासद, कामगार यांना यामुळे अधिक दर देणे फायद्याचे ठरणार आहे. भाजप प्रवेशामुळे माझ्यासह पक्षाचे स्पिरीट (ऊर्जा) द्विगुणित झाली आहे. यासाठी सुभाष बापूंचे मनापासून अभिनंदन... दादांना सहजासहजी पक्षात आणणे सोपे नव्हते. मात्र गनिमी काव्याने सुरुवातीला कार्यकर्त्यांना आपलेसे करत दादांच्या प्रवेशापर्यंत पोहोचलो. दादांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही असा शब्द देत योग्य वेळी त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल असे ठोस वचन दिले.
किसनवीर कारखान्यावर उभारण्यात आलेले शाहिद स्मारक पाहून भरावल्याचे सांगत यातून मदनदादांच्या शाहीदांच्याप्रति असलेल्या भावनांचे प्रतिबिंब दिसले. याच ठिकाणी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांचे स्मृतीवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी असे आदेश प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहिदांची आणि एकूणच भारतीय जवानांची कामगिरी देशाचा अभिमान वाढवणारी आहे. यापूर्वी असे भ्याड हल्ले होत होते. परंतु केवळ धिक्कार आणि युनो मध्ये तक्रार याशिवाय काहीच होत न्हवते, उरी हल्ल्याच्या नंतर भाजप नेतृत्वाने सर्जिकल ष्ट्राईक केले, पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा मूहतोड जवाब दिला. नावाभारत हा रडणारा नसून लढणारा आहे हे मोदींनी दाखवून दिले. भ्याड हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सैन्याला त्यांनी सर्वाधिकार दिले. मोदींच्या मजबूत इराद्यामुळेच पाकिस्थानात अडकलेला अभिनंदन 48 तासात भारतात परतला. बलशाली भारतासाठी मोदींनी नवा यज्ञ मांडला आहे त्याचे साक्षीदार होण्यासाठी मदनदादांचा भाजप प्रवेश महत्वपूर्ण ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आजचा कार्यक्रम केवळ डिस्टलरीचा उदघाटन आहे का? मदनदादांचा भाजप प्रवेश कधी? दादांनी मुखमंत्र्यांना तलवार भेट दिली आहे. मात्र त्या तलवारीने एकट्यानेच लढायचे का ? असा सवाल विचारत उपस्थितांना यात सर्वांनी सहभागी व्हायचे का असा प्रश्न विचारताच उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी आजच मदनदादांचा भाजप प्रवेश व्हावा अशी हात उंचावून सहमती दिली. त्यांच्या आवाहनाला सर्वांनीच जोरदार प्रतिसाद दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदनदादांच्या हातात भाजपचा झेंडा देत प्रवेश निश्चित करण्यात आला.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समयसे पहिले कुछ नही मिलता. योग्य वेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदनदादांचा भाजप मध्ये झालेला प्रवेश पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकत वाढवणारा आहे. आजवर कॉंग्रेस शी एकनिष्ठ राहिलेल्या मदनदादांनी मनावर दगड ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दादांनी घेतलेल्या या निर्णयाचा योग्य सन्मान करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात मदनदादा म्हणाले की, ज्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर आमच्या पक्षाची मैत्री होती त्यांनी कधीच आम्हाला मित्र मानले नाही मात्र विरोधक असून देखील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जवळचा मित्र मानले. एकाच कारखान्याला दोन वेळा भेट देत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कडेलोट होता होता वाचवले आहे. शेतकरी सभासदांना एफआरपी देण्यात अडचण होते. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने शेतकरी व सभासदांना पैसे देण्यासाठी वेळ मिळाला. या कामी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मोलाची कामगिरी बजावली. कारखान्याला डिस्टलरीची परवानगी देणारे प्रा. सुहास फरांदे हे केंद्राच्या समितीत असल्याने त्यांचीही खूप मदत झाली. तेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. या सर्वांनीच मदत केल्याने दररोज एक लाख लिटर अल्कोहोल निर्मितीचा हा प्रकल्प उभारण्यात आला. कारखान्याच्या कामगारांनी एक दिवसाचा पगार शाहिदांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी दिला आहे. ही भावना ही महत्वपूर्ण आहे. कारखान्याचे 52 हजार सभासद हे आपलं कुटुंब असून त्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी समूह अपघात विमा योजना अंतर्गत सभासदांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. पुलवामा हल्ल्यात जखमी झालेला जवान वीर यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याच्या वतीने मदनदादांनी मुख्यमंत्र्यांना तलवार भेट दिली. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले.
मोबाईल नंबर डायल करून झाले हजारो कार्यकर्ते भाजप सदस्य...
मंत्री देशमुख यांनी मदनदादांच्या भाजप प्रवेशासाठी आग्रही भूमिका घेत उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना मोबाईल नंबर डायल करायला सांगितले. नंबर डायल केल्यानंतर तुम्हा सर्वांना वेलकम भाजप असा मेसेज आला आहे का? असे विचारले असता सर्वांनीच होकार दिला. सहज सोप्या रीतीने आपण सर्वजण भाजपचे सद्स्य झाला आहात असे सांगताच सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.
अन् दादांचे डोळे पाणावले...
मंत्री देशमुखांनी मदनदादांनी आजच भाजप प्रवेश करावा अशी आग्रही मागणी केली असता मदनदादांनी त्यांच्या जवळ जात मला विचार करायला थोडा अवधी द्या असे मुख्यमंत्र्यांकडे पहात सांगितले. परंतु ना. देशमुख आणि उपस्थित जनसमुदाय यांच्या आग्रहाखातर दादांचा भाजप प्रवेश लगेचच घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दादांच्या निर्णयाचे कौतुक करत त्यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे सांगताच मदनदादा भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले.
उपस्थित कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचा फड्या...
मदनदादांचा भाजप प्रवेश होताच उपस्थित सुमारे 20 हजार कार्यकर्त्यांनीही आपल्या गळ्यात भाजपचा फड्या घातला. यावेळी हर हर मोदी.. घर घर मोदी.. भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. मदनदादांच्या पत्नी डॉ. सौ नीलिमा भोसले यांच्यासह कुटुंबियांना भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे फड्या घालून स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केतन मदन भोसले, यशराज मोहन भोसले व ईशान गजानन भोसले या तिघांचा व्यासपीठावर सत्कार केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |