11:29am | May 04, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीवर दिव्यांग बांधवांनी बहिष्कार टाकला आहे. आपल्या न्याय्य मागण्या मान्य होण्यासाठी वारंवार प्रशासनाच्या भेटी, निवेदने देवूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने हे पाऊल उचलल्याचे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी सांगितले.
सातारा लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर वाटचाल करीत आहे. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला एकेका मताची किंमत माहित आहे. एक मतही काय करु शकते, याची जाणीव त्यांना आहे. प्रशासनही नागरिकांना मतदान करण्यासाठी वारंवार जनजागृती करताना दिसत आहे. मात्र, असे असताना दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने सातारा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष अजय पवार म्हणाले, केवळ निवडणूक आली की आम्हा दिव्यांगांकडे प्रशासनाचे लक्ष जाते. मात्र, आमचेही मत निर्णायक ठरु शकते, हे संबंधित विसरतात. मतदान करण्यासाठी आमच्यासमोर पायघड्या घालणारे निवडणूक झाल्यानंतर आमची भेटही घेत नाहीत. आम्ही आमच्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकार्यांची भेट घेवून याचबरोबर निवेदनेही देवून आमच्यावर होत असल्याचा पाढा संबंधितांसमोर वाचला आहे. मात्र संबंधित यंत्रणा थातूरमातूर उत्तरे देवून आमची बोळवण करीत आहे. त्यामुळेच आम्ही दिव्यांगांनी सातारा लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी प्रशासनाकडे दिव्यांग योजनांची अंमलबजावणी व्हावी, खासदार निधीतून दिव्यांगांना मदत मिळावी, सर्व प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये कर्णबधिरांची तपासणी व्हावी, दिव्यांगांना आरोग्य विमा मिळावा, उच्च शिक्षण मिळावे, दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत, नेत्रदानाविषयी जनजागृती व्हावी, दिव्यांगांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर शासनाने लक्ष द्यावे, दिव्यांगांसाठी विशेष न्यायालय असावे, दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नियमावली तयार करावी, रेल्वे मंत्रालयाने दिव्यांगांसाठीचे डबे मध्यवर्ती करुन घ्यावेत, सर्व सरकारी इमारती दिव्यांगफ्रेंडली कराव्यात, या मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |