09:14pm | Jun 21, 2022 |
सातारा : खंबाटकी बोगद्यात जमिनी गेलेल्या वेळे, वाण्याचीवाडी, खंडाळा या तीन गावांतील शेतकर्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.
वेळे, वाण्याचीवाडी, खंडाळा या तीन गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्यासमवेत खंबाटकी बोगद्याजवळच खा. उदयनराजे भोसले यांनी बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पी. डी. कदम, विशेष भूमि संपादन अधिकारी अर्चना नष्टे, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी हरीष पाटणे, चिन्मय कुलकर्णी, वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप, माजी जि.प. सदस्य शशिकांत पवार यांच्यासह तिन्ही गावांचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
खंबाटकी बोगद्याच्या प्रकल्पामध्ये वेळे, वाण्याचीवाडी, खंडाळा या तिन्ही गावांतील शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. राष्ट्रीय प्रकल्प म्हणून शेतकर्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. मात्र, जमिनींचे संपादन चुकीच्या पद्धतीने केले गेले. समृद्धी महामार्गाला भूमिसंपादनाचा वेगळा निकष आणि खंबाटकी बोगद्याच्या भूमिसंपादनाला वेगळा निकष लावण्यात आला. त्यामुळे या तीनही गावांतील शेतकर्यांवर अन्याय झाला. शिवाय या तीनही गावांना प्रकल्पाचा कोणताही लाभ दिला जात नाही. त्यामुळे या तीनही गावांतील शेतकर्यांनी खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली होती. या भेटीत खंबाटकी बोगद्याच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन खा. उदयनराजेंनी शेतकर्यांना दिले होते. त्यानुसार सोमवारी खा. उदयनराजे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पी.डी. कदम, विशेष भूमि संपादन अधिकारी अर्चना नष्टे यांनाही बोलवण्यात आले होते. हॉटेल आराम येथे खा. उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त गावांनी आपल्या समस्या मांडल्या. भूमिसंपादन करताना चुकीच्या पद्धतीने मोजमापे घेतली गेली. झाडे, ताली यांचे मोजमाप नीट केले गेले नाही. संपादित केलेल्या जमिनीच्या व्यतिरिक्त उरलेल्या क्षेत्राचा ठावठिकाणा शेतकर्यांना लागत नाही. त्यामुळे संपादित क्षेत्राच्या व्यतिरिक्त उरत असलेले क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व विशेष भूमि संपादन अधिकार्यांनी काढून द्यावे, अशी मागणी तीनही गावांतील शेतकर्यांनी केली. खा. उदयनराजे भोसले यांनी दोन्ही अधिकार्यांना संबंधित संपादित जमिनींची फेरमोजणी करून उरलेले क्षेत्र संबंधित शेतकर्यांना दाखवून द्यावे. त्यांच्यासमोर संयुक्त मोजणी करावी, अशा सूचना दिल्या. खंबाटकी बोगद्याच्या प्रकल्पामुळे वेळे येथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नष्ट होत असून पाण्याचा प्रवाह खंडाळ्याच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे वेळे येथे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत खंडाळ्याच्या हद्दीत वेळ्यासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर खोदून तिथून वेळ्याला पाणीपुरवठा करणारी योजना तयार करावी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी वेळे ग्रामस्थांनी केली. याबाबत वस्तूस्थिती पाहून वेळेकरांना दिलासा मिळेल, अशी कृती तातडीने कशी करता येईल हे पाहून घ्यावे, अशा सूचना खा. उदयनराजेंनी अधिकार्यांना दिल्या.
प्रकल्पात वेळे गावातील शेतकर्यांच्या विहिरी व फळबाग शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. या विहिरी व फळबागा वाचवाव्यात, अशी आर्त मागणी शेतकर्यांनी उदयनराजेंच्याजवळ केली. याबाबतही खा. उदयनराजे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना देवून संबंधित शेतकर्याची विहीर कशी वाचवता येईल याद़ृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
प्रकल्पात वाण्याचीवाडी येथील शेतकर्यांच्या जमिनी जावूनही त्यांना खंडाळा एवढा मोबदला दिला गेला नाही. प्रकल्पात दिलेले योगदान लक्षात घेवून वाण्याचीवाडी या गावाला बोगद्यालगत अॅप्रोच रस्ता कायमस्वरूपी मिळावा, अशी मागणी शेतकर्यांनी व ग्रामपंचायतीने केली. खा. उदयनराजेंनी त्याला तातडीने मान्यता देत याबाबत आम्ही स्वत: व हरीष पाटणे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून आलो असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याला तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे वाण्याच्यावाडीला कनेक्टीव्हिटी मिळेल. तुम्ही चिंता करू नका, असे खा. उदयनराजेंनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पी.डी. कदम यांनीही ना. गडकरी यांच्या कार्यालयाकडून तशा सूचना आल्या असल्याने ही कनेक्टीव्हिटी दिली जाईल, असे बैठकीतच सांगितले.
तिन्हीही गावांना संपादित जमिनीचा योग्य मोबदला दिला गेलेला नाही. तो तातडीने मिळावा, यासाठी तिन्ही गावातील शेतकरी लवादाकडे गेले आहेत. या शेतकर्यांना खा. उदयनराजेंनी न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका हरीष पाटणे व चिन्मय कुलकर्णी यांनी घेतली. खा. उदयनराजे म्हणाले, तुम्ही एकत्रित लवादाकडे दाखल करा. आपण शेतकर्यांच्या हितासाठी लवादाकडे दाद मागू. कोणत्याही प्रकल्पाला शेतकरी जमिनी देतात. जमिनी घेताना सरकारी अधिकारी गोड बोलतात. प्रत्यक्ष जमिनी घेतल्यानंतर शेतकर्यांकडे डुंकूनही पाहिले जात नाही, हे अत्यंत चुकीचे आहे. शेतकर्यांची ही तळमळ तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. तीनही गावांतील शेतकर्यांवर मी अन्याय होवू देणार नाही. भूमिसंपादनाचा योग्य मोबदला व या तीनही गावांतील शेतकर्यांचे प्रकल्पाच्या अनुषंगाने सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रसंगी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यापर्यंत पाठपुरावा करू, असा शब्दही खा. उदयनराजे यांनी दिला.
यावेळी सलग 50 वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत असलेल्या वाण्याचीवाडीच्या ग्रामस्थांचे खा. उदयनराजेंनी कौतुक केले. खंबाटकी बोगद्याच्या कामाचीही खा. उदयनराजे यांनी पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या.
यावेळी काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, वेळे गावचे सरपंच रफिक इनामदार, उपसरपंच शितल पवार, वाण्याचीवाडीचे सरपंच शंकर पाटणे, वेळ्याचे माजी सरपंच दशरथ पवार, सुरेश पवार, आनंदराव मोरे, यशवंत भिलारे, संदीप भिलारे, सचिन भिलारे, अभिनव पवार, संतोष रघुनाथ पवार, बळवंत पाटणे, मुरलीधर पाटणे, दिपक पवार, नलावडे, दत्तात्रय लांडगे, स्वप्नील कांगडे, शुभांगी डेरे, मारूती भिलारे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |