नवी दिल्ली: देशभर केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध सुरू आहे. विरोधी पक्ष व विविध शेतकरी संघटना नवीन कृषी कायदे रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलने करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आंदोलकांना आंदोलन न करता चर्चा करा, असे आवाहन केले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या आंदोलनात सहभागी झालेल्या वृध्द लोकांचा विचार करून आंदोलन संपवा. आपण सोबत मिळून चर्चा करू आणि मार्ग काढू. काही सुधारणा करण्यासाठी आम्हाला संधी द्या. याशिवाय मोदी म्हणाले की, सभागृहाची पवित्रता समजून घ्या. ज्या 80 कोटी लोकांना स्वस्त धान्य मिळते, ते सुरूच राहील. लोकसंख्या वाढत आहे आणि जमीन कमी होत आहे. आपल्याला असे काही करायचे आहे की, शेतकर्यांवर सर्व भार पडता कामा नये. आपण, राजकारणात अडकलोत, तर काहीच होणार नाही.
तसेच शेतकरी आंदोलनावर खूर चर्चा झाली. पण, मुळ विषयावर चर्चा झाली असती, तर चांगले झाले असते. कृषी मंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले, पण त्याचे उत्तर मिळालेच नाही. देवेगौडा यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अखेर शेतीची समस्या आहे तरी काय ? मी चौधरी चरण सिंह यांच्या हवाल्याने सांगू इच्छितो की, त्यांनी 1971 मध्ये म्हटले होते- 33% शेतकरी अल्पभूधारक आहेत. 18% शेतकर्यांकडे 2 ते 4 एकर जमीन आहे. 51% शेतकरी शेतीवर जगू शकत नाही.
10 कोटी शेतकर्यांच्या खात्यात पैसे पोहचले
मोदी पुढे म्हणाले की, फक्त निवडणुका आल्यावर कर्जमाफीची चर्चा होते. यामुळे लहान शेतकर्यांचा फायदा होत नाही, कारण त्यांचे बँकेत खातेही नसते. आधीची विमा योजना फक्त मोठ्या शेतकर्यांसाठी होते. सिंचनाची सुविधा मोठ्या शेतकर्यांसाठी होती. लहान शेतकर्यांना फक्त हाल आपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. पण, आम्ही 2014 मध्ये विमा योजनेची व्याप्ती वाढवली. मागील 4-5 वर्षात शेतकर्यांना 90 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. प्रत्येक शेतकर्याला आम्ही क्रेडिट कार्ड देत आहोत. ‘प्रधानमंत्री सम्मान निधि’ योजने अंतर्गत 10 कोटी शेतकर्यांचा खात्यात पैसे जात आहेत. बंगालचे शेतकरी यात आले असते, तर आकडा अजून वाढला असता.
दरम्यान, काँग्रेसने रविवारी सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार मानण्यासाठी राज्यसभेत 25 पक्षातील 50 नेत्यांनी भाग घेतला होता. यात भाजपचे 18, काँग्रेसचे 7 आणि इतर पक्षांचे 25 खासदार सामील झाले. या सर्वांसाठी 15 तासांचा वेळ देण्यात आला होता. सुरुवातीला विरोधी पक्षांना नवीन कृषी कायद्यांवर स्वतंत्रपणे वादविवाद हवे होते, परंतु नंतर त्यांनी आभार प्रस्तावावरील चर्चेत याला समाविष्ट करण्याचे मान्य केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |