नागपूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या देशाची खरी ओळख ही विविधतेत एकता आहे. केवळ एक धर्म ही आपल्या देशाची ओळख नव्हे. एकच धर्म आणि एकच विचारधारा म्हणजे राष्ट्रवाद नव्हे. अशा विचारधारेने देशाचे अस्तित्व धोक्यात येईल, अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्ग समारोप कार्यक्रमात राष्ट्रवादाची स्पष्ट भूमिका मांडली.
काँग्रेसच्या मुशीत जडणघडण झालेल्या मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर वादास तोंड फुटले होते. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या उपस्थितीबाबत नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेस विचारधारेच्या मुखर्जींच्या भाषणाकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहिले होते.
मुखर्जींचे संघाच्या मुख्यालयात आगमन झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांचे स्वागत केले. रेशीमबागेतील आयोजित संघाच्या तृतीय शिक्षा वर्ग समारोप कार्यक्रमात त्यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना कायम विरोध करत आलेले प्रणव मुखर्जी आजच्या कार्यक्रमात काय बोलणार,
याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर स्पष्ट करण्यासाठीच आपण या कार्यक्रमास आलो आहोत, असे सांगून मुखर्जी म्हणाले की, देशासाठी समर्पण हीच खरी देशसेवा होय. विविधतेत एकता हेच भारताचे वैभव आणि सौंदर्य आहे. वसुधैव कुटुंबकम हीच राष्ट्रवादाची खरी प्रेरणा आहे. त्यामुळे देशाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. भारत स्वतंत्र विचाराचा देश आहे. भेदभाव, तिरस्कार करीत बसलो, तर देशाची ओळख धोक्यात येईल. केवळ एकच धर्म अथवा एकाच विचारधारेमुळे राष्ट्रवादाची संकल्पना मर्यादित ठेवता येणार नाही. भारतातूनच बौद्ध धर्म जगाने आत्मसात केला. भेदभाव केल्यास भारताच्या प्रतिमेला धक्का बसेल. सहिष्णुता हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ओळख आहे. समाजात सलोखा प्रस्थापित करून निर्णय आणि हिंसाचारमुक्त वातावरण निर्माण करणे हीच देशभक्ती आणि राष्ट्रवादाची ओळख आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पंडित नेहरू यांनीदेखील सहिष्णुतेचाच पुरस्कार केला. भारतावर अनेक हल्ले झाले, मात्र संस्कृती अबाधित राहिली.
आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतील अनुभव स्पष्ट करताना ते म्हणाले की, भारतीय हीच आपली खरी ओळख. देशाची सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे. अनेक भाषा आणि बोलीभाषा असूनही एकाच ध्वजासाठी आणि राज्यघटनेखाली देशवासीय गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. विविधता, सहिष्णुता यामध्येच भारत वसला आहे. राष्ट्रवाद कोणत्याही जात, धर्म भाषेच्या अधीन नाही. एक भाषा, एक धर्म ही आपली ओळख नाही. भारतीय हीच आपली खरी ओळख आहे. सात धर्म, 122 भाषा आणि 600 बोलीभाषा आपल्या देशात आहेत. तरीही भारत एकसंध आहे, अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादाचे विचार संघाच्या स्वयंसेवकांसमोर मांडले.
संघ फक्त हिंदूंसाठी नसून सर्व समाजासाठी : भागवत
यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संघ हा फक्त हिंदूंसाठी नसून देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती हा भारताचा सुपुत्र आहे. हिंदूच नव्हे, तर प्रत्येकाला जोडण्याचे काम संघाच्या वतीने करण्यात येत आहे. विविध विचारधारेच्या महापुरुषांनी समाजात एकता प्रस्थापित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना जोडण्याचे काम संघाच्या वतीने सुरू आहे. स्वातंत्र्य लढ्यात डॉ. हेडगेवार काँग्रेससोबत होते. क्रांतिकारकांच्या लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. मतभेद आपल्या ठिकाणी असले, तरी सर्व भारतीय एक आहोत, हा संदेश हेडगेवार यांनी दिला होता. सर्व घटकांना एकत्र आणणे हेच संघाचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |