04:22pm | Nov 22, 2018 |
सातारा : मुहम्मद पैगंबर या महामानवाने जगाला समता व शांततेचा संदेश दिला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सातार्यात आयोजित करण्यात आलेली सर्व धर्म भाईचारा सभा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून अशा उपक्रमांची देशाला आवश्यकता आहे. कारण आजमितीस धर्मांचा वापर करुन राजकारण करण्यामुळे जातीय व धार्मिक विद्वेष निर्माण होत आहे. इतिहासातील वास्तव न पाहता खोटय़ा कथा रचल्या जात आहेत. खाण्यावरुन माणसे मारली जात आहेत. अशा विघातक वातावरणातून बाहेर पडून देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मानवता, सर्वधर्मसमभाव व भाईचारा आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.
मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त येथील गांधी मैदानावर मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्व धर्म भाईचारा सभेत प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. पुनियानी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे, शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलिल अहमद तसेच टिळक मेमोरियल चर्चचे डॅनियल गायकवाड, भारतीय बौध्द महासभेचे विद्यासागर गायकवाड, लिंगायत संघर्ष समितीचे सागर कस्तुरे, शीख समाजाचे प्रतिनिधी पालसिंग रामगढिया व महानुभव पंथाचे प्रतिनिधी राजकुमार बीडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी एकमेकांच्या हातात घेत सर्व धर्म भाईचाऱयाचा नारा देताच त्यांना साथ देत गांधी मैदानावर उपस्थितांनीही मानवतेचा गजर केला.
प्रा. डॉ. पुनियानी यांनी इतिहासातील अनेक दाखल देत आपल्या देशात कधीही धर्मावरुन युध्दे व राजकारण झाले नसल्याचे वास्तव समोर आणले. पूर्वीचे राजे हे जमिनीवरील सत्ता व संपत्तीसाठी एकमेकांत लढत होते. हिंदू राजांच्या पदरी मुसलमानही होते व मुसलमान राजांच्या पदरी अनेक हिंदू कार्यरत होते. त्यामुळे ही धार्मिक लढाई नव्हतीच. मंदिरे लुटल्याचे सांगण्यात येते मात्र तत्कालीन परिस्थितीत लढाई झाल्यानंतर लुटालूट होतच असे. त्याकाळी मंदिरातून संपत्तीचा संचय करण्यात येत असल्याने संपत्ती मिळवण्यासाठी मंदिरे तोडली गेल्याची उदाहरणे आहेत. मग ती हिंदू राजांनीही तोडली तर मुस्लिम राजांनीही तोडली आहेत. कालांतराने इतिहासाची तोडफोड करत त्याला धार्मिक स्वरुप देण्याचे काम करताना धर्मांचा वापर राजकारणासाठी करण्यात आला. यामुळे लाखो, हजारो निरपराधांना त्यासाठी आपला जीव गमवावा लागला आहे.
या सर्वात इस्लाम धर्माला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मात्र, मुहम्मद पैगंबर साहेब हे जगाला शांततेचा, समतेचा संदेश देणारे पहिले महामानव आहेत. कुराणातील आयतांचा चुकीचा अर्थ लावून काहीजण वागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे इस्लाम बदनाम होत आहे. मात्र, इस्लामला बदनाम करण्यात अमेरिकेचा मोठा पुढाकार आहे. वेस्ट एशियातील इराक, इराण, अफगाणीस्तान, पाकिस्तान या भागातच आंतकवाद फोफावला आहे. हा आंतकवाद इस्लाम धर्मासाठी मुळीच नाही. तेथील तेलांच्या विहिरींवर व त्यातून मिळणाऱया संपत्तीवर कोणाची मालकी यातून अमेरिकेनेच ब्रेनवॉश करुन अतिरेकी निर्माण त्याचे परिणाम वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यातून भोगल्यानंतर आता अमेरिका त्याला इस्लामिक दहशतवाद म्हणत आहे ते खरे नाही, असे प्रा. डॉ. पुदियानी यांनी निदर्शनास आणून दिले.
भारतीय स्वातंत्र्य लढय़ात मुस्लिम व हिंदू खांद्याला खांदा लावून इंग्रजांच्या विरोधात लढले आहेत ते आंतकवादी कसे असतील. बहाद्दूरशाह जफर, तात्या टोपो, झाशीची राणी यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारले यात कोठे होता हिंदू, मुस्लिम धार्मिक वाद. इंग्रजांच्या राजवटीत तोडा, फोडा आणि राज्य करा या संकल्पनेतून धार्मिक वाद पेटवण्यात आले. त्याला काही मुस्लिम नेते बळी पडले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याची फळे पाकिस्तान भोगत आहे. आता देशातही धर्मादिष्ठित राजकारण सुरु असून त्याचा विकासाला काहीही उपयोग होणार नाही त्यासाठी नागरिकांनी स्वतःहून अशा प्रवृत्तींना बाजूला सारत आपली विविधतेने नटलेली संस्कृती जपताना देशाच्या विकासासाठी जातीय, धार्मिक द्वेषातून मुक्त झाले पाहिजे. आपण पहिले भारतीय आहोत हेच संविधानाने सांगितले असल्याचे प्रा. पुदियानी यांनी सांगितले.
ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात मुहम्मद पैगंबर यांचा इतिहास समोर मांडला. जगाला शांतता, समता व मानवतेचे लिखित संविधान देणारा अरब राष्ट्रातील पहिला महामानव म्हणून पैगंबरांकडे पहावे लागते. भारतात याच मानवता विचारांची परंपरा चार्वाक, बुध्दापासून ते संत नामेदव, ज्ञानेश्वर, जगदगुरु तुकाराम, गाडगेमहाराज, गुरु नानक, संत कबीर, महात्मा फुले ते अलिकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरेपर्यंत येवून पोहोचते. मानवता धर्माची प्रतिष्ठापणा करण्यासाठी या महामानवांनी प्रचंड संघर्ष केला. इन्सानियत, मानवता हेच विचार माणसांना तारु शकतात. कोणत्याच धर्माने वाईट वागण्याचा संदेश दिला नाही. सर्व धर्माच्या संतांनी देह देवाचे मंदिर असून प्रत्येकाने देवासारखे नाही तर किमान माणसासारखे तरी वागून चांगले जीवन जगा असा संदेश दिला आहे. वारकरी सांप्रदायाने हीच परंपरा जपत मानवतेचे तत्वज्ञान मांडले असून देव सर्वत्र एकच असून माणुसकी हाच खरा धर्म असून आपण कोणत्याही धर्मातील असला तरी प्रथम माणुसकी धर्माचे पालन केले पाहिजे, असे डॉ. सुहास फडतरे यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. मुझफ्फर सय्यद यांनी प्रास्ताविक केले. रझिया खान, हेमा सोनी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रफीक शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध जातीधर्मातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रा. डॉ. राम पुदियानी यांच्याबरोबर छायाचित्र, सेल्फी घेण्यासाठी युवक, युवतींसह नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |