11:12pm | Apr 01, 2020 |
बुध : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून बचावा करिता परराज्य व मुंबई पुणे इत्यादी ठिकाणाहून मूळ निवासी खटाव तालुक्यातील आपापल्या गावात पोहोचले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार 27 मार्च अखेरपर्यंत खटाव तालुक्यात 15058 व्यक्तींची नोंद झाली आहे. परदेशातून आलेल्या 33 जणांचाही त्यात समावेश आहे. परदेशातून आलेल्या 33जणांना होम क्वारंटाईन म्हणून त्यांना शिक्के मारलेत व आरोग्य विभाग त्यांचेवर लक्ष ठेवून आहे.
दुष्काळी खटाव तालुक्यातील सुशिक्षित अर्धशिक्षित कामाच्या शोधार्थ मुंबई पुणे तथा परराज्यात गेलेले आहेत. काही विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी राज्यातील अन्य शहरांमध्ये गेले होते .राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने सुरक्षिततेचा उपाययोजण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी तसेच सीमारेषा शील केल्या आले आहेत. जीवनावश्यक सेवा वगळता सर्वावर बंदी आणल्यामुळे शैक्षणिक संस्था तसेच कंपन्यातूश उत्पादनही बंद आहे .सर्व प्रकारचे व्यवसायही बंद झाले असल्याने विविध कंपन्यातील कर्मचारी ,शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी, छोटे-मोठे व्यवसायिक, मजूर आपल्या मूळ गावी येत आहेत. पुणे मुंबई व इतर ठिकाणाहून तालुक्यात आलेल्या ची संख्या 15058 एवढी आहे. तालुक्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 33 आहे .परदेशातून आलेल्या 33जणांना होम क्वारंटाईन म्हणून त्यांना शिक्के मारलेत व आरोग्य विभाग त्यांचेवर लक्ष ठेवून आहे.असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनुस शेख यांनी सांगितले. पुणे-मुंबई या ठिकाणाहून आलेल्यानाही खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातील बहुतेक लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. प्राथमिक काळजी म्हणून हस्तांदोलन टाळावे, खोकताना तोंडावर रुमाल धरावा, हास्याचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे .गावोगावी राज्यातील विविध भागातून आलेल्या काही जणांनी आपली माहिती लपविल्याने त्या त्या भागात भीती आहे त्यामुळे गावात गल्लीत परिसरात बाहेरून आलेली व्यक्ती बिनधास्त फिरत असल्यास स्थानिक प्रशासनाकडे त्याची नोंद करावी असे आवाहनही तालुक्यातील प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |