08:16pm | Jul 06, 2018 |
सातारा : सातारा नगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ठराव केला आहे परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. गणेशोत्सवाला थोडा अवधी राहिल्यानंतर बैठका सुरु होतात. त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सावासाठी पालिकेने तातडीने कार्यवाही करुन अंमलबजावणी करावी अशी मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांना दिले.
निवेदनात, सातारा नगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी ठराव करुन चांगला निर्णय घेतला परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. गेल्या दोन वर्षात गणेशोत्सवजवळ आला की बैठकांचा सिलसिला सुरु होता त्यात एकमत होऊन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अवधी राहत नाही. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तींची उंची, गणेश विसर्जन, गणेश विसर्जन मार्ग, पर्यावरणपूरक उत्सव, सामाजिक शांतता याबाबत नगरपालिकेने तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. सर्वात पहिल्यांदा मूर्तींची उंचीबाबात कुंभार समाजाची तातडीने बैठक घेणे आवश्यक आहे. मागील वर्षी झालेल्या बैठकीत जे निर्णय झाली परंतु वेळेअभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची सर्वात प्रथम अंमलबजावणी करावी. कुंभार समाज, गणेश मंडळे यांची बैठक घेऊन मुर्तींच्या उंचीबाबत नियम घालून देणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
ज्या मंडळांना उंच मूर्ती बसावयाच्या आहेत त्याची आणि सामाजिक शांतता, सलोखा राखण्यासाठी मंडळावर जबाबदारी देण्याबाबत चर्चा होणे आवश्यक, सर्व विभागांशी समन्वय कोणी साधायचा हे ठरवणे आवश्यक आहे. गणेश विसर्जनाबाबत दरवर्षी गोंधळ होत असून यावर्षी तो दूर करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत परंतु त्याबाबत तातडीने अंतिम निर्णय होऊन कार्यवाही आवश्यक आहे. तसेच गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग सर्व मंडळांच्या समन्वयाने ठरवून त्यास अंतिम मान्यता होणे आवश्यक आहे. या सर्व उपाययोजना केल्या तरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी मदत होईल. आवश्यकता भासल्यास सातारा नगरपालिकेने पुढाकार घेऊन एक समिती स्थापन करावी त्यात प्रत्येक विभागाचा सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळांचे सदस्य असावेत. समितीच्या प्रत्येक आठवडयाला आढावा बैठक घेण्यात यावी म्हणजे योग्य समन्वय राखला जाऊन तातडीने अंमलबजावणी होईल अशी मागणीही करण्यात आली आहे.
...तर नगराध्यक्षांविरोधात आंदोलन
गेल्या दोन दिवसांपासून याबाबतचे निवेदन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांना द्याचे होते परंतु ठराविक नगरसेवक आणि अधिकारी घेऊन त्या त्यांच्या दालनात बसतात. नागरिकांचे प्रश्न ऐकायला, निवेदन घ्यायला त्यांना वेळ नाही. त्या नागरिकांना भेटत नाहीत, त्यांचे प्रश्न सोडवत नाहीत मग ठराविक अधिकारी आणि नगरसेवकांना घेऊन त्या दालनामध्ये काय करतात हे सातारकरांना समजले पाहिजे. नगराध्यक्षांना वेळ नसल्याने नाईलाजाने उपनगराध्यक्षांना निवेदन द्यावे लागले. यापुढील काळात त्यांनी नागरिकांना भेट दिली नाही, त्यांचे प्रश्न, त्यांची निवेदन घेतली नाहीत तर वेगळया पध्दतीने आंदोलन करावे लागेल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |