10:57pm | Oct 09, 2019 |
सातारा : श्रीनिवास पाटील यांनी दोन वेळा खासदारपद, राज्यपालपद भूषवले, पृथ्वीराजबाबांच्याकडे पंतप्रधान कार्यालय , खासदारकी एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्रीपद होते. एवढी मोठी पदे असताना त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? असा प्रश्न सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
येथील कल्याण रिसॉर्ट येथे येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत उदयनराजे बोलत होते. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेश शिंदे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सुनील सावंत, रवी साळुंखे, जि.प. सदस्य अर्चना देशमुख, भाग्यश्री मोहिते , गीतांजली कदम, संदीपभाऊ शिंदे, प्रवीण धस्के, रेश्मा शिंदे, विजय काळे, सयाजीराव पाटील, अलका बोभाटे, समृद्धी जाधव, सतीश माने, नानासाहेब शिंदे, रमजान मुलानी आदी उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेच्या विकासाला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. आम्ही ज्यांच्याबरोबर यापूर्वी काम केले त्यांनी आमचा केवळ नावासाठी वापर करून घेतला. प्रत्येक वेळी आम्हाला अडचणी निर्माण करण्यात आल्या. तरीदेखील आम्ही सातारा जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले. आम्ही काय विकास केला असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणत असले तरी त्यांना माझे सांगणे आहे की पृथ्वीराजबाबा तुम्ही पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होता,खासदार होता एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री होता, मग तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? कोणते मोठे काम तुम्ही केले? ते तुम्ही सांगावे मगच आमच्यावर टीका करावी. श्रीनिवास पाटील हे दोनदा खासदार होते, सिक्कीमचे राज्यपाल होते .एवढी मोठी पदे असताना असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिले? याची त्यांनी माहिती देणे गरजेचे आहे. याउलट आम्ही सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे .त्यामुळे सलग तीन वेळा या जनतेने आम्हाला मताधिक्याने त विजय केले आहे. यावेळीही जनतेची साथ निश्चितच आपल्या मिळेल, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील जनतेने नेहमीच माझी पाठराखण केली आहे. तुंम्ही नसता तर मी नसतो. माझी पाठराखण करून मला साथ दिली.0 आज जे काही मी आहे त्याचे सर्व श्रेय जनतेला आहे . नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला मी प्राधान्य दिले आहे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने चुकीच्या पद्धतीने राजकारण केले. कृष्णा खोऱ्याचा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नाही. त्यामुळे आजही अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तरुण पिढी विकासापासून वंचित ठेवण्याचे काम करत मूठभर लोकांनी स्वार्थ साधला. शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला जरंडेश्वर कारखाना त्यांनी गिळंकृत केला. आपण तरुण पिढीचे आयुष्य असेच जाऊ वाया जाऊ देणार का? याचा विचार आपण करणे गरजेचे आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी धावून जातो. तुमच्यासाठी मी जीवात जीव असेपर्यंत लढत राहणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशात, राज्यात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही वेगळे चित्र यावेळेस दिसणार आहे. हा जिल्हा तुमच्या, आमच्या ताब्यात येणार आहे. एक वेळ पुन्हा संधी द्या, एक वर्षात जिल्ह्याच्या विकासात बदल घडवून आणतो,असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
महेश शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात महायुतीची लाट असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे आता भावनिकतेचा प्रश्न करण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांचा असलेला जरंडेश्वर कारखाना का गेला याचे उत्तर विद्यमान आमदारांनी देण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याची तुमची लायकी नसून २४ तारखेनंतर कुठला मायचा लाल शेतकर्यांवर अन्याय करणार नाही. महाराजसाहेब आपले महावितरणचे कार्यालय शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना बारामतीला गेले, ते परत आणायचे आहे.यावेळेस सातारा जिल्ह्यात भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समृद्धी जाधव म्हणाले, राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सावध भूमिका घ्यायची असते. कुणी कितीही नाचूद्या, महाराज साहेब तुमचा शब्द पडेल तिथे आमचा प्राण पडेल. कार्यकर्त्यांनी एकजुटीने महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य द्यावे.
सुनील काटकर म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी मतदार संघात विकासाचे पर्व निर्माण केले आहे. मात्र गेल्यावेळी अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची खंत महाराजांनी बोलून दाखवली. यावेळी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मोठे मताधिक्य देऊन रुसवे-फुगवे बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले
संदीप शिंदे म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे, त्यामुळे सातारा मतदारसंघात यावेळी मोठे मताधिक्य घेऊन महाराज विजयी होतील.
गीतांजली कदम म्हणाल्या, उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्यांना नेहमीच न्याय दिला आहे. जनता हेच सर्वस्व मानून महाराजांनी विकासकामे मार्गी लावली आहेत त्यामुळे यावेळी मोठे मताधिक्य देऊन महाराजांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे.
प्रवीण धस्के म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात केलेली विकासकामे जनतेला माहीत आहेत, त्यामुळे निवडणुकीपुरते येणाऱ्या विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय केले यावर बोलावे. जनता उदयनराजेंवर प्रचंड प्रेम करते त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी थांबवावे,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रामजान मुलाणी, सतीश माने यांना वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |