कराड : मलकापूर नगरपरिषदेचा विजय खर्या अर्थाने विकासाचा विजय आहे. त्याकरीता मलकापूरच्या मतदारांचे मी आभार मानतो. विशेषतः महिला वर्गाच्या मतदानाचा हा ऐतिहासिक विजय आहे असे म्हणावे लागेल. असे गौरवोद्गार आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूर (ता.कराड) येथे झालेल्या नगरपरिषदेच्या विजयी सभेत बोलताना काढले.
यावेळी कॉंग्रेसच्या सर्व विजयी नगरसेवक, नगसेविकांचा आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर, आ.जयकुमार गोरे, जि.प.सदस्य उदयसिंह पाटील, आ.आनंदराव पाटील, जयवंत जगताप, हिंदुराव पाटील, मनोहर शिंदे, पै.नाना पाटील, राजाभाऊ पाटील उंडाळकर, झाकीर पठाण, इंद्रजित चव्हाण, बाळकृष्ण पाटील, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, रजनीताई पवार उपस्थित होते.
आ.पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, मलकापूरची निवडणूक ही यापुढे होणार्या येथील प्रत्येक निवडणूकीची तालिम होती. मलकापूरची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली त्याप्रमाणात येथील विकासही वाढला जनतेकरता येथे सोई होत गेल्या. याच भरवशावर आम्ही मते मागितली व त्यावर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला विजयी केले. आम्ही नुसते आश्वासन देत नाही तर ती पुर्णही करतो. याचा भरोसा यानिमित्ताने आम्ही जनतेला दिला आहे. निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्यावतीने मी आपल्या सर्वांना जाहीरपणे सांगू इच्छितो या निवडणूकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने मी स्वतः पुर्ण करण्यास बांधील आहे. ज्या प्रमाणे यापुर्वीची सर्व वचने आम्ही पूर्ण केली. त्याप्रमाणे याहीपुढे नक्की करनारच असा विश्वास यानिमित्ताने आपणास देतो. ज्यांचा विकासाशी कसलाही संबंध नाही त्यांना जनतेने पराभूत केले आहे. मलकापूर नगरपरिषद ही राज्यात नावलौकिक मिळवणारी नगरपरिषद ठरेल. असा आशावादही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
भाजप सरकार सर्व स्तरावर फोल ठरले आहे. त्यांचे परतीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यांच्या भुलथापांना आता समाज बळी पडत नाही. त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेली कोणतीही आश्वासने अद्याप पुर्ण केलेली नाहीत. जनतेने दिलेली एकमेव संधी त्यांनी गमावली आहे. युवकांना तसेच शेतकरी व्यापारी व सर्वच स्तरातील मतदार राजाला भाजपाने फसवले आहे. नोटबंदीने जवळपास सव्वाकोटी युवक बेरोजगार झाले. गेल्या 45 वर्षांत ही पहिलीच वेळ युवकांवर या देशात आली. ऊस उत्पादक, दुध उत्पादक व्यावसायीक दृष्ट्या नष्ट झाला. याचे देणे-घेणे नसलेल्या सरकारला मागिल निवडणूकीत तीन राज्यात मतदारांनी नाकारले त्यानंतर शहाणपणाला आलेल्या मोदी सरकारने नुकतेच परंपरा सोडून सादर केलेल्या बजेटमध्ये घोषणांचा पाऊस पाडला व जनतेची फसवणूक करण्याचा त्यातुन प्रयत्न केला. मात्र यातून देशातील गरीबांना काहीही मिळणार नाही. या बोगस घोषणांना लोक बळी पडणार नाहीत. या पुढे होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत आता भाजपाचा पराभव निश्चित आहे त्याची सुरवात मलकापूर नगरपरिषदेपासून झाली याकरीता मलकापूरचा विजय ऐतिहासिक असल्याचे गौरोद्गार देखील यावेळी आ.चव्हाण यांनी काढले.
यावेळी मनोहर शिंदे म्हणाले, आम्ही लोकांसमोर विकासाचा जाहीरनामा घेवून गेलो मात्र अनेक खोट्या भुलथापा व प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केली. सत्तेत असल्याचा गैरवापर विरोधकांकडून झाला. पोलिस प्रशासन वापरून घेत विरोधक निवडणूक लढले. इतक होऊनही मलकापूरच्या लोकांनी त्यांना साप नाकारले हा विजय मतदारांच्या सयंमाचा आहे. निवडणूकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने आपण पुर्ण करणार आहोत. युवकांना उद्योग धंदे झोपडपट्टी पुर्णवसन, नवीन प्रशासकीय इमारतीची उभारणी, ज्येष्ठ नागरिकांना मदत, मुस्लिम व सर्व समाजाच्याकरीता दफनभुमी व स्मशानभुमीची सुविधा अशा अनेक विकासात्मक बाबी या पाच वर्षांत आपण करणार आहोत. मलकापूरच्या विकासाची विरोधकांनी भाषा केली. प्रथम त्यांनी रेठर्याचा विकास करावा. येथे मोफत मिटर देणार असे सांगितले. कराडमध्ये तुमची सत्ता आहे तेथे मोफत मिटर देवून दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भोसलेंना मलकापूरचा विकासच करायचा असेल तर त्यांनी ट्रस्टचा राहिलेला 5 कोटीचा टॅक्स मलकापूर नगरपरिषदेमध्ये भरून मलकापूरच्या विकासासाठी एक प्रकारे मदतच करावी असा उपरोधिक टोला त्यांनी यावेळी लगावला. आपल्या सहकार्यांच्या विजयाची माझीच जबाबदारी असल्याचे सांगून पराभुत झालेल्यांच्याही पराभवात आपलीच जबाबदारी असल्याची त्यांनी नम्रपणे कबुल केले. सर्वांना बरोबर घेवून विकासात्मक काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.निलम येडगे म्हणाल्या, देशात मलकापूरचे नाव मोठे आहे त्याकरीता पृथ्वीराज बाबांची मोलाची साथ व आशिर्वाद कारणीभूत आहेत. स्व.भास्करराव शिंदेंनी मलकापूरसाठी जे स्वप्न पाहिले ते साकारण्याचे व्रत घेवून आम्ही निवडणूकीला सामोरे गेलो. आम्ही सांगितलेले विकासाचे व्हीजन लोकांना पटले तेच पुर्ण करण्यासाठी मनोहर शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करणार आहोत.
आ.जयकुमार गोरे म्हणाले,मनोहर शिंदेंनी मलकापूरसाठी जे जे चांगले उपक्रम राबविले त्याची दखल राज्यपातळीवर घेतली गेली याच जोरावर पुन्हा जनतेने विश्वास टाकला याबद्दल मतदाराचे आभार मानतो. एम 50 जो गाडीवर टाकता ते कार्यालय बाबांनी मंजूर करुन आणले आहे.आता मलकापुरचा अभ्यास भरपूर झाला आता कृष्णा चँरीटेबलचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.मलकापुर निवडणुकीसारखी ताकद एकवटली भविष्यात असली मंडळी येणारच नाही.धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देतो म्हणाले पण कोठे आहे आरक्षण तो धनगर समाज त्याना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
रणजितसिंह निबांळकर म्हणाले मलकापुरचे अर्धवट सर्व प्रकल्प पुर्ण होण्यासाठी मनोहर शिंदे यांची गरज आहे.लुग्यासुग्याच्या नादाला लागू नका.ही फक्त निवडणूपुरती असतात हे लक्षात ठेवावे.
अँड.उदयसिंह पाटील म्हणाले की,2019 हे निवडणुकीचे वर्षे आहे याची सुरवात मलकापुरात चांगली झाली याच समाधान आहे.चव्हाणसाहेबाची संस्कृती आहे की, प्रत्येक गोष्टीच प्रबोधन गरजेचे असताना हे फक्त पैशाच्या जोरावर निवडणूका लढवतात. सत्तेचे विक्रेद्रीकरण झाले तरच सामान्य माणूस या प्रवाहात येईल.हे काम काकानी यापूर्वी करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात सध्या अराजकता माजत आहे.यापुर्वी ज्यानी देशाला बलिदान दिले त्याना आपण उत्तर देणार.मतदान हे दान देण्याची व्यवस्था आहे विक्रीची व्यवस्था नाही हे सर्वानी लक्षात घ्यावे असे आवाहन केले.
राजाभाऊ उंडाळकर यावेळी म्हणाले मलकापूरची निवडणूक ही धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशीच झाली आहे. पैशाच्या जोरावर काही ठिकाणी आपल्याला दगा झाला.मनोहर शिंदेंनी विकासाच्या मुद्दयावर मते मागीतली याकडे तरुण कार्यकर्तेनी लक्ष दिले नाही. याचे कारण म्हणजे ही मंडळी फक्त पैशामुळे चुकीच्या दिशेला गेली.यावर मंथन होणे आवश्यक आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी आ.आनंदराव पाटील तसेच कॉंग्रेस नेते अजित आप्पा चिखलीकर, बंडानाना जगताप आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक व आभार राजेंद्र यादव (आबा) यांनी मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |