02:54am | Jun 28, 2019 |
फलटण : घटनात्मकदृष्ट्या ५० टक्के आरक्षण देण्यास मर्यादा असली तरी अपवादात्मक परिस्थितीत त्यात बदल करता येतो, असे सांगतानाच सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आणि या निकालाचा स्पर्श कानावर येताच फलटण तालुक्यातील तमाम मराठा समाजाने या निर्णयाचे स्वागत करीत छ. शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत ज्यांनी या आरक्षणासाठी बलिदान दिले त्या समाजबांधवाना श्रद्धांजली वाहिली आणि साखर व फटाके वाजवून सरकार चे व सर्व राजकीय पक्षांचे आभार मानत साखर व पेढे वाटून जल्लोष केला या वेळी एक मराठा लाख मराठा घोषणा देत फलटण चा संपूर्ण परिसर मराठामय केला.
आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासच असल्याचे सांगत मराठा समाजाला नोकर्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या १६ टक्के आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या असून हा महत्वपूर्ण निर्णय दिल्याने फलटण शहरासह ग्रामीण भागात मोठा आनंद झाला आहे.राज्य सरकारला विशेष अधिकारात अशाप्रकारे आरक्षण देण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के आरक्षणाचा विचार करावा या साठी मराठा समाजाने आत्तापर्यंत 34 हुन अधिक बळी पडले मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानुसार शिक्षणात १३ आणि नोकरीत १२ टक्के आरक्षण द्यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकर्या व शैक्षणिक अभ्यासक्रमांतील प्रवेशांत १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात व समर्थनात केलेल्या जनहित याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून जवळपास दररोज अंतिम सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी या याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे मराठा आरक्षणावरील याचिकांवर सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यावर उच्च न्यायालयाने आज अंतिम फैसला सुनावताना कोर्टाने हे मत नोंदवलंय. निकालावेळी तमाम मराठा समाजाचे लक्ष लागले होते.
मराठा समाजाचे राज्यव्यापी मूक मोर्चे काढले या मध्ये तालुका स्तरावरील सर्वात मोठा मोर्चा फलटण मध्ये निघाला होता या मुळे या मूक मोर्चा ची गंभीर दखल घेऊन, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी कायदा मंजूर केला होता. हे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाच्या कोणत्या प्रवर्गात सामावून घेणार, असा प्रश्न विविध स्तरांतून उपस्थित करण्यात आला होता. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी या समाजातील नेत्यांनी आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी विरोध केला. दोन्ही समाज दुखावले जाऊ नयेत, यासाठी सरकारने सुवर्णमध्य साधत मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता विशेष प्रवर्गाची निर्मिती केली. 'सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग' (एसईबीसी) असे नाव या वर्गाला देण्यात आले.
यामुळे पुढील पिढीला या आरक्षणाचा फायदा होईल असे सांगत या युती शासनाचे व सर्वच राजकीय पक्षांचे आभार मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी मानले व सर्वांना साखर व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले या वेळी मोठया संख्येने समाजबांधव छ. शिवाजी महाराज चौकात जमले होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |