कराड : गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने घोषणा केलेल्या योजनांपैकी कॉंग्रेस सरकारच्या सत्तेमधील 80 टक्के योजनांची नांवे बदलून त्या पुढे नेल्या आहेत. याव्यतिरिक्त नरेंद्र मोदींनी सोनेरी भारताची स्वप्ने दाखवली होती. त्यांची आश्वासने व्यावहारीक होती का, हे तापसण्याची गरज आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा केल्याचे आता उघड झाल्याने भाजप सरकारला येत्या निवडणूकीत जाहीरनामासुध्दा प्रसिध्द करणे मुश्कीलीचे ठरणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी धार्मिक दंगली घडवायच्या व विरोधकांमध्ये वितुष्ठ आणायचे प्रयत्न सरकार करत आहे. देशात हुकूमशाहीची राजवट यायची नसल्यास नरेंद्र मोदींना देश व राज्यातून हुसकावून लावण्यासाठी सज्ज रहा. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. त्यामुळे निवडणूकीचा निकालही स्पष्ट आहे. राफेल विमान खरेदीच्या घोटाळ्यात केवळ नरेंद्र मोदी तुरुंगात जाणे बाकी आहे, असा घणाघात राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
गोटे (ता. कराड) येथे हाजी रज्जाकभाई पटेल-तबांखूवाले यांनी आयोजीत केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन संमारंभात ते बोलत होते. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. कराडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा विद्याताई थोरवडे, सरपंच सौ. यास्मीन पटेल, उपसरपंच अविनाश पवार, निसार मुल्ला, राष्ट्रवादीचे सरचिटणीस मंहमद आवटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन देसाई, सुभाष चव्हाण, शिवाजीराव जमाले, हणमंतराव भोपते, रविंद्र बडेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आ.चव्हाण म्हणाले, अठराशे कोटींची कामे करणे ही बाब कराड दक्षिणमधील जनतेच्या आशीवार्दामुळे मला शक्य झाली. एवढा निधी मिळवण्याचे श्रेष्ठत्वही मला तुमच्यामुळे प्राप्त झाले. 1991 साली तुम्ही मला संधी दिली नसती, तर मी राज्याच्या सर्वोच्च पदावर गेलो नसतो. ते म्हणाले, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी व त्यांचे सहकारी अमित शहा यांनी नरसंहार केल्यामुळे मोदींना अमेरिकेने व्हिस्सा नाकारला होता. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने परदेश दौरे वाढवले. दौऱयांचाही उच्चांक झाला आहे. गेल्या साडेचार वर्षात मोदींनी राहूल गांधी व कॉंग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा मुकाबला केलेला नाही. ते केवळ मन की बातमधून लोकांची दिशाभूल करत आहेत. जनतेच्या प्रश्नांना तोंड देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चालले आहे, हेही समजत नाही.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता शहरी नगरसेवकाप्रमाणे आहे. शहरी व ग्रामीण भागाचा समांतर विकास झाला पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका ग्रामीण विकासाविरोधात आहे. सरकार धार्मिक दंगली घडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कराड दक्षिणमध्ये अविनाश मोहिते यांना अशीच दहशत दाखवून त्यांना तुरुंगात टाकले. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या दुसऱया एका माजी अध्यक्षांनी भाजपमध्ये उडी टाकली. त्यांनी उडी टाकली हे ठीक आहे, पण आपलं स्वत-चं सगळं सोडवून घ्या. पुन्हा सरकार बदलले तर अडचण होईल, असा उपरोधिक सल्ला त्यांनी मदनराव मोहिते यांचे नाव न घेता दिला.
आ.आनंदराव पाटील म्हणाले, जसे आमचे नेते स्वच्छ आहेत. तसे त्यांचे कार्यकर्तेही स्वच्छ आहेत. अनेकजण काल कुठे होती व आज कुठे आहेत, हे जनता जाणून आहे. ज्यांची उंची नाही ती मंडळी पृथ्वीराजबाबांवर टिका करत आहेत. पण तुमच्या कुणाचीही बाबा दखल घेत नाहीत. ते नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तरे देत आहेत. बाबांवर बोलणारे ज्या पक्षात जातात तेथे पराभव नक्की आहे. ते म्हणाले, सर्व जाती-धर्मांना एकत्रित घेवून जाणारा कॉंग्रेस पक्ष आहे. या विभागातील सर्व जाती-धर्मातील लोकं एकत्रित नांदत आहेत. येत्या निवडणूकीत भाजपची मंडळी जातीभेदातून वादंग निर्माण करतील, त्यापासून सावध रहा. नामदेव पाटील, विद्याताई थोरवडे, मंहमद आवटे यांची भाषणे झाली. सौ. यास्मीन पटेल यांनी स्वागत केले. अकबर शेख यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. हाजी रज्जाकभाई पटेल-तंबाखूवाले यांनी आभार मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |