कराड : राजीव गांधींनी महिलांना सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी पहिले पाऊल राजकीय क्षेत्रात त्यांना आरक्षण देण्यातून टाकले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. पुढे हे आरक्षण विधानसभेमध्ये आणण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केले. परंतु सध्याच्या सरकारने राज्यसभा व लोकसभेत पुरेसे बहुमत असतानाही याबाबत काहीही केलेले नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण 50 टक्क्यांपर्यंत नेले. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर महिलांना राजकारणात नक्की आरक्षण मिळेल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कराडमध्ये आयोजित केलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातील महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महिलांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. सुरुवातीस त्यांनी आपल्या बालपण, शिक्षण व राजकारण याबाबतची पार्श्वभूमी विषद केली. ते म्हणाले, माझ्या बालपणात आई-वडिलांच्या संस्कारांचा प्रभाव पडला. माझ्या आईला समाजकार्याची खूप आवड होती. तिने वडिलांबरोबर राजकारणात सहभाग घेतला. 1952 ची निवडणूक जिकल्यानंतर आमचे घराणे राजकीय पटलावर आले.
ते म्हणाले, मी पिलानी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारा महाराष्ट्रातील एकमेव होतो. चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतल्यामुळे मी दिल्लीतून कराडचा विकास साधला. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर कराडचा विकास आणखी वेगाने केला. 108 क्रमांक रुग्णवाहिका व राजीव गांधी जीवनदायी योजना ह्या माझ्या मुख्यमंत्री काळातील महत्वाकांक्षी योजना ठरल्या. कराडमध्ये औधोगिक क्षेत्र व आयटी टॉवर उभे करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर औधोगिकीकरण वाढवून विध्यार्थ्यांसाठी संशोधन केंद्रे उभारण्याचा माझा पुढील पाच वर्षात प्रयत्न राहील.
ते म्हणाले, शाशवत शेती, वाढते नागरीकरण व बेरोजगारी या माझ्यादृष्टीने राज्यातील मोठ्या समस्या आहेत. शेती सिंचनाखाली येण्याचा टक्का वाढला पाहिजे. नागरी सुविधा सुधारल्या पाहिजेत. व बेरोजगारी नाहीशी केली तर पुढील पिढी सुरक्षित राहील, असे मला वाटते.
सर्वसामान्य ते राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीबरोबर तुमची तितकीच उठबस आहे. तुम्ही परवा कृष्णा घाटावर हातगाड्यावरील पोहे खाल्ले याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आ. चव्हाण म्हणाले, मी परवा घाटावर गेल्यानंतर बराच वेळ जुन्या सहकार्यांबरोबर गप्पा मारल्या. नदीकाठी फिरून ताजे वातावरण पाहिले. त्यानंतर मग सहकार्यांनी आग्रह केला की, चहा पिऊया. मग मी त्या हातगाड्यावर गेल्यानंतर मला पोहे खाण्यासाठी आग्रह झाला. मी तो स्वीकारून पोहे खाल्ले. यात मी सर्वसामान्यांसारखा राहिलो. पण विरोधकांनी याचे राजकारण करत टिका केली. पण मी पोहे खाऊन काय पाप केले का? असा सवालही त्यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळत शेवटी उपस्थित केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |