05:07pm | Jan 03, 2019 |
सातारा : कोरेगाव-भीमा, ता. शिरुर, जि. पुणे येथील 1 जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पडल्यामुळे विजयस्तंभाच्या अभिवादन सोहळ्यासाठी गेलेल्या हजारो सातारकरांनी सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आभार मानले. अनेकांनी याबाबत ‘सातारा टुडे’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्यावर्षी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या राज्यभरातील दलित बांधवांवर कोरेगाव-भीमा तसेच परिसरात जाळपोळ, दगडफेक, हाणामारीच्या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. त्यावेळी झालेल्या दंगलीमध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता, तर हजारो लोक जखमी झाले होते. या घटनेमुळे महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघाले होते. पोलिसांनी सालाबादप्रमाणे बंदोबस्त ठेवल्याने तसेच खबरदारीच्या उपाययोजना न केल्यामुळे गेल्यावर्षीची दंगल पेटली होती. पुरेसे पोलीसबळ नसल्यामुळे गेल्यावर्षी पोलिसांना परिस्थिती लवकर आटोक्यात आणता आली नव्हती. यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. अनेकजण आरोपींच्या पिंजर्यात उभे होते. गेल्यावर्षीची धग कायम असतानाच यावर्षीच्या वर्षारंभालाच पुन्हा एकदा कोरेगाव येथील राज्य व देशभरातून लाखो दलित बांधव अभिवादन करण्यासाठी येणार असल्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी होती. गेल्यावर्षीच्या घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दलाने कंबर कसलेली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून यासंदर्भात बंदोबस्ताचे नियोजन सुरु होते. 1 नोव्हेंबरपासूनच पोलीस अधीक्षक संदीप पाटील व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विजयस्तंभ आणि परिसराला वारंवार भेटी दिल्या होत्या. गेल्यावर्षीच्या दंगलीत सहभागी असणार्या अनेकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तसेच सर्वच समाजातील स्थानिकांना शांतता कमिटीत सहभागी करुन घेतले होते. त्यामुळे कोरेगाव-भीमा व शिक्रापूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक राजकीय पुढारी यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सर्व जातीधर्मांमध्ये एकप्रमाणे जातीय सौदार्ह निर्माण करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले होते.
राज्यभरातून व आजुबाजूच्या जिल्ह्यातून तब्बल 5 हजार पोलीस कर्मचार्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जागोजागी चेक पॉईंट्स, बंद इंटरनेट सेवा, मोबाईल जामर, बॅरिकेट्स आदींमुळे पोलिसांशिवाय विजयस्तंभ ठिकाणी काय सुरु आहे, हे कोणालाच काहीही समजणे शक्य नव्हते. 600 वॉकिटॉकीवरुन पोलीस एकमेकांशी समन्वय साधत होते. त्यामुळेच कोरेगाव-भीमा येथे झालेला अभिवादन सोहळा शांततेत पार पडला. संदीप पाटील यांच्या कार्याची व नियोजनाची चमक पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळाली. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले संदीप पाटील सातारसारख्या राजकीय विषयात जागृत असणार्या सातारा जिल्ह्यात आपल्या कार्यशैलीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. देशभर व जगभर चर्चिल्या गेलेल्या कोरेगाव-भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या कोरेगाव-भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडून संदीप पाटील यांनी आपले नाणे खणखणीत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
यानिमित्ताने संदीप पाटील यांच्याकडून राज्यातील अनेक चमको आयपीएस अधिकार्यांनी धडा घ्यावा, संदीप पाटील यांची सातारा जिल्ह्यातून बदली होण्याच्या काही दिवस अगोदर मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सातार्यात दगडफेक व दंगल झाली होती. स्वत: दंगलीच्या स्पॉटवर उतरुन संदीप पाटील यांनी दंगल आटोक्यात आणली होती. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत संदीप पाटील किरकोळ जखमीही झाले होते. परंतू तशाही परिस्थितीत त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते. पुणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर दुसर्या दिवशी झालेली चाकण येथील दंगलही पाटील यांनी शमवली होती. वाई येथील क्रुरकर्मा, सिरीयल किलर संतोष पोळ, खा. उदयनराजेंचे सोना एलॉयज, सातारा जिल्ह्यातील अवैध खासगी सावकारांच्या आवळलेल्या मुसक्या, सुरुची राडा प्रकरण, मराठा मोर्चा दरम्यान घडलेली दगडफेक व दंगल या सर्व घटना संदीप पाटील यांनी आपल्या कार्यशैलीच्या जोरावर लिलया हाताळल्या. कोणताही गाजावाजा न करता हा माणूस आपले कर्तव्य बजावत असतो. जिथे जाईल, तिथे एकरुप होवून आपले कर्तव्य बजावतो. कोरेगाव-भीमा निमित्ताने संदीप पाटील यांनी डोळ्यात भरेल अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात ‘वेल डन संदीप पाटील’ असे म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.
सातार्यातील अनेकांनी मानले संदीप पाटील यांचे आभार
1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो लोक गेले होते. परंतू पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित व अप्रिय घटना यावेळी घडली नाही. सुयोग्य नियोजनामुळे अनेकजण त्याचरात्री सुखरुप घरी पोहोचले. केवळ पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या तगड्या नियोजनामुळे भीमा-कोरेगाव येथील अभिवादनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला, अशी प्रतिक्रिया रिपाईं नेते दादासाहेब ओव्हाळ यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |