तुरबत : पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या हवाई तळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला आहे. तुरबत शहरात असलेल्या पीएनएस सिद्दीकी या हवाई तळावर बॉम्बस्फोट आणि गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. चीनची गुंतवणूक असल्याचा आरोप करत बीएलएने याठिकाणी हल्ला केला. एवढेच नाही तर ज्याठिकाणी चीनच्या ड्रोन्सचा तळ होता, तिथेच हल्ला केल्याचा दावा बीएलएने केला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने सहा हल्लेखोरांचा खात्मा केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर तुरबतमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही बीएलएने हल्ला केला होता.
बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार बीएलए संघटनेच्या माजीद ब्रिगेडने हा हल्ला घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. पाकिस्तानमधील डॉन या वर्तमानपत्राने तुरबतमधील मकरानचे आयुक्त सईद अहमद उमरानी यांच्या हवाल्याने या हल्ल्याची माहिती दिली आहे. उमरानी म्हणाले की, हवाई तळाच्या तीन बाजूंनी हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केला. मात्र सुरक्षा दलांनी तात्काळ त्याल प्रत्युत्तर दिले. हवाई तळाच्या परिसरात येण्यापासून हल्लेखोरांना रोखण्यात यश मिळाले.
हवाई तळाच्या बाहेरच सहाही हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांच्या मृत्यूनंतर हवाई तळाची पाहणी करून सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली. हवाई तळाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे बीएलएने मात्र त्यांच्या हल्ल्यात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे. तसेच अनेकजण जखमी झाल्याचेही ते म्हणाले. मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये ज्या ज्या ठिकाणी चीन गुंतवणूक करत आहे, त्याठिकाणी हल्ले केले जात आहेत. पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन बलुचिस्तानच्या संसाधनचा विनाश करत आहेत, असा आरोप बीएलएकडून करण्यात येतो. यावर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने इराणमध्ये एअर स्ट्राईक करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते.
बीएलएच्या माजीद ब्रिगेडकडून करण्यात आलेला या महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. २० मार्च रोजी ग्वादर बंदरावर अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन सैनिक आणि आठ हल्लेखोर मारले गेले असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |