04:33am | Apr 30, 2019 |
खंडाळा : वडील हा घराचा भक्कम आधार असतो. माता-पित्यांची वृद्धपणी सेवा करणारी मुलेच ईश्वराची देण असतात. जे वृद्धपणी आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडतात त्यांना मुले म्हणवून घेण्याचा अजिबात हक्क नसतो. आजच्या पिढीतील मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांना स्वत:च्या श्वासाप्रमाणे सांभाळायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. उमेश कीर्दत महाराज यांनी केले.
वाण्याचीवाडी, ता. खंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहात स्व. वसंतराव पाटणे यांच्या तृतीय पुण्यतिथी सोहळ्यात आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते.
ह.भ.प.कीर्दत महाराज म्हणाले, टी.व्ही. व चित्रपटातील हिरोंपेक्षा आपले आई-वडील हेच आपले हिरो असले पाहिजेत. मात्र, आज तशी परिस्थिती दिसत नाही. मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडतात. म्हातारपणी त्यांचा सांभाळ करत नाहीत, अशी मुले समाजात सुद्धा वावरायच्या योग्यतेची नाहीत. खंडाळा तालुक्यातल्या एका दुर्गम गावात वसंतराव पाटणे यांनी संस्काराच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाची उभारणी केली. आज 28 वर्षे एक छोटीशी वाडी हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहे. वसंतराव पाटणे यांच्या निधनानंतर त्यांची मुले वडिलांचा वसा सांभाळत आहेत. ज्या गावात रस्ते नव्हते, पाणी नव्हते, शाळा नव्हती, स्मशानभूमी नव्हती, सुव्यवस्थेचा अभाव होता. त्या गावात हरीष पाटणे यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने नंदनवन उभे केले आहे. छोटीशी वाडी शहराला लाजवेल असा विकासाचा बाज घेवून उभी रहात आहे. वडिलांचे संस्कार कसे असावे याचा आदर्श वाण्याचीवाडी येथे आल्यानंतर पहायला मिळाला. उच्चपदावर असूनही एवढी विनम्रता, गरीब माणसांमध्ये मिसळण्याची वृत्ती आणि वाडीसह पंचक्रोशीतील गरजवंतांना मदत करण्याची प्रामाणिक भावना त्यांच्या मुलांमध्ये दिसते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून हे गाव एकसंध आहे. छोटे छोटे सण, सार्वजनिक कार्यक्रम एकदिलाने करणारी ही वाडी त्यामुळेच तालुक्याचे उत्तम संस्कार पीठ झाली आहे, असेही कीर्दत महाराज म्हणाले.
ग्रामस्थांच्यावतीने बोलताना हरीष पाटणे म्हणाले, टीव्ही आणि चित्रपटातील नटांना अनेकजण आपले हिरो मानतात, पुस्तकांमधील नायकांना अनेकजण आदर्श समाजसुधारक मानतात. मी माझ्या आयुष्यात वडिलांशिवाय दुसरा हिरो पाहिला नाही. माझ्या घरातच जीताजागता समाजसुधारक होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या भागातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांचीच शिकवण हयातभर जपेन.
यावेळी वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, पारगाव, असवली, अजनुज, खंडाळा, बावडा परिसरातील ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |