03:46pm | Nov 06, 2022 |
मेलबर्न : सर्यकुमार यादव पुन्हा एकदा तळपल्याचे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. सूर्याने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत २५ चेंडूंत नाबाद ६१ धावा साकारल्या आणि टी-२० क्रिकेटमधील आपल्या १००० धावाही पूर्ण केल्या. सूर्याच्या या धडाकेबाज फटकेबाजीमुळे भारताला या सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभारता आला. त्यापूर्वी लोकेश राहुलने दमदार अर्धशतक साकरले आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येचा चांगला पाया रचला.
रोहित शर्मा पुन्हा एकदा या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. रोहितला यावेळी १५ धावा करता आल्या आणि भारताला २७ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित लवकर बाद झाला असला तरी त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली आणि भारताच्या डावाचा चांगला आकार दिला. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. कोहलीला यावेळी २६ धावा करता आल्या.
कोहली बाद झाला तरी राहुल मात्र खेळपट्टीवर कायम होता आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. राहुलले यावेळी दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र राहुलला जास्त धावा करता आल्या नाहीत. राहुलने यावेळी ३५ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाला आणि रिषभ पंत फलंदाजीला आला. पंतला या सामन्यात संधी देण्यात आली होती, त्यामुळे तो या संधीचे सोने करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण पंतला यावेळी या संधीचे सोने करता आले नाही. पंत यावेळी फक्त तीन धावांवर बाद झाला.पंत बाद झाला आणि त्यानंतर भारताचे काय होणार, ही चिंता चाहत्यांना होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्या यावेळी भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले आणि त्याने मैदानात सर्व ठिकाणी आपले फटके लगावले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |