07:39pm | Oct 25, 2022 |
पुसेगाव : कोविड नंतर प्रत्येकाला आपली खरी गरज काय आहे ते जाणवले. माणूस वैयक्तिक पैसे कमवू शकतो पण शिक्षण आणि आरोग्य कधीच वैयक्तिकरित्या कमवू शकत नाही. राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योग्य धोरण राबविले तरच भविष्यामध्ये कोरोनासारख्या एखाद्या भयंकर संकटाचा आपण सामना करू शकतो. त्यामुळे सरकारने दोन्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे मत शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
खटाव येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार कै. एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपआण्णा विधाते, सामाजिक कार्यकर्ते अरुण अदलिंगे, विजयराव बोर्गे, जीवनराव इंगळे, विलास भोसले, मनोज देशमुख, मोहन घाडगे, एकनाथ चव्हाण, अंबाबाई क्रिडा मंडळ आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थीत होते.
डॉ. थोरात पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात अनेक युरोपीय देशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शाळा सुरळीत सुरू ठेवल्या होत्या. मात्र भारतात भीतीपोटी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी भारतातील मुले सामाजिक ज्ञानात दोन वर्ष मागे राहिली असून हा बॅकलॉग भरून काढणे खूप अवघड आहे.
कोरोनानंतर भारतात औषधांचा अतिवापर सुरू झाल्यामुळे माणसांच्या शरीरात रोज जास्त प्रमाणात विविध प्रकारची औषधे जात आहेत. जगात कुठलच औषध किंवा आहार परिपूर्ण नसतो. शरीराला संतुलित आहाराची गरज असते. माणसाला 90% आजार मानसिकता आणि आहारातून होतात. त्यामुळे काय खावे किंवा काय खाऊ नये हे वैज्ञानिक भाषेत नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
भारतात मराठी माणूस मागे असल्याचे बोलले जाते. खरंतर मराठी माणूस कुठेच मागे नाही. महाराष्ट्र आपल्या देशाचा युरोप, अमेरिका आहे. महाराष्ट्राएवढे प्रगत, प्रगतिशील वैचारिक बैठक असणार दुसरं राज्य देशात कोणतंच नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच महाराष्ट्राला वैचारिक बैठक असणारे धोरणकर्ते मिळाल्यामुळे शैक्षणिक, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र प्रगत आहे. मात्र कोरोनानंतर संपुर्ण जग बदललं असून शिक्षणं आणि आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते यांनी मनोगत व्यक्त करताना एम. आर. सरांचे विचार आजच्या आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार अविनाश कदम, सुत्रसंचलन लेखक, निर्माते तेजपाल वाघ, तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |