07:39pm | Oct 25, 2022 |
पुसेगाव : कोविड नंतर प्रत्येकाला आपली खरी गरज काय आहे ते जाणवले. माणूस वैयक्तिक पैसे कमवू शकतो पण शिक्षण आणि आरोग्य कधीच वैयक्तिकरित्या कमवू शकत नाही. राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योग्य धोरण राबविले तरच भविष्यामध्ये कोरोनासारख्या एखाद्या भयंकर संकटाचा आपण सामना करू शकतो. त्यामुळे सरकारने दोन्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे मत शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
खटाव येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार कै. एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपआण्णा विधाते, सामाजिक कार्यकर्ते अरुण अदलिंगे, विजयराव बोर्गे, जीवनराव इंगळे, विलास भोसले, मनोज देशमुख, मोहन घाडगे, एकनाथ चव्हाण, अंबाबाई क्रिडा मंडळ आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थीत होते.
डॉ. थोरात पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात अनेक युरोपीय देशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शाळा सुरळीत सुरू ठेवल्या होत्या. मात्र भारतात भीतीपोटी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी भारतातील मुले सामाजिक ज्ञानात दोन वर्ष मागे राहिली असून हा बॅकलॉग भरून काढणे खूप अवघड आहे.
कोरोनानंतर भारतात औषधांचा अतिवापर सुरू झाल्यामुळे माणसांच्या शरीरात रोज जास्त प्रमाणात विविध प्रकारची औषधे जात आहेत. जगात कुठलच औषध किंवा आहार परिपूर्ण नसतो. शरीराला संतुलित आहाराची गरज असते. माणसाला 90% आजार मानसिकता आणि आहारातून होतात. त्यामुळे काय खावे किंवा काय खाऊ नये हे वैज्ञानिक भाषेत नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
भारतात मराठी माणूस मागे असल्याचे बोलले जाते. खरंतर मराठी माणूस कुठेच मागे नाही. महाराष्ट्र आपल्या देशाचा युरोप, अमेरिका आहे. महाराष्ट्राएवढे प्रगत, प्रगतिशील वैचारिक बैठक असणार दुसरं राज्य देशात कोणतंच नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच महाराष्ट्राला वैचारिक बैठक असणारे धोरणकर्ते मिळाल्यामुळे शैक्षणिक, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र प्रगत आहे. मात्र कोरोनानंतर संपुर्ण जग बदललं असून शिक्षणं आणि आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते यांनी मनोगत व्यक्त करताना एम. आर. सरांचे विचार आजच्या आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार अविनाश कदम, सुत्रसंचलन लेखक, निर्माते तेजपाल वाघ, तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |