12:13pm | Sep 23, 2022 |
मुंबई : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी मुंबई-महाराष्ट्रासह, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आदी ११ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकले. ‘एनआयए’ने या राज्यांमधील 'पीएफआय'च्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली. या कारवाईत तपास यंत्रणांनी शंभरपेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून तब्बल १०६ जणांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईपैकी सर्वांत मोठी कारवाई महाराष्ट्र, केरळमध्ये करण्यात आली. केरळमध्ये २२ जणांना, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी २० जणांना अटक झाली. याशिवाय तमिळनाडू (१०), आसाम (९), उत्तर प्रदेश (८), आंध्र प्रदेश (५), मध्य प्रदेश (४), पुदुच्चेरी व दिल्ली (प्रत्येकी ३) आणि राजस्थान (२) अशा विविध राज्यांत ही कारवाई झाली. ‘एनआयए’ने देशभर एकाच वेळी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईबाबतचे अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नसून, ‘एनआयए’सह सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि संबंधित राज्य पोलिस दल यांनी १५ राज्यांत ही कारवाई केली.
देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या घातपाती, तसेच समाजकंटकाकडून केलेल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलिस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी येत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अहवालातून समोर आले. या संघटनेच्या वतीने परदेशातून विशेषतः आखाती देशातून येणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापर जात असल्याची माहिती होती.
पैशांचा स्रोत आणि त्याचा झालेला वापर याबाबत ईडीने सखोल चौकशी केली. यानंतर 'पीएफआय'च्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा केंद्रीय गृहमंत्रालयास देण्यात आला. ही संघटना देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर एनआयए आणि ईडीने देशभरातील १५ राज्यातील शंभरहून अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी या यंत्रणांनी या राज्यातील स्थानिक तपास यंत्रणांना यात सहभागी करून घेतले. सर्व यंत्रणांनी मिळून एकाच वेळी हाती घेतलेल्या धाडसत्रामध्ये देशभरातून १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले.
महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड या चार ठिकाणी देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करून २० पदाधिकारी आणि 'पीएफआय'शी संबधितांची धरपकड केली. मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून शेख सादिक, मोहम्मद इकबाल खान, मझहर खान, मोमीन मिस्त्री, आसिफ खान या पाच जणांना अटक करण्यात आली. या पाच जणांना एटीएसने गुरुवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, न्यायाधीशांनी सुनावणीअंती त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली.
या राज्यांमध्ये छापेमारी
केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि मणिपूर.
राज्यात या ठिकाणी छापे
राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे भादंविच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात तेढ वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दाखल गुन्ह्यातील कलमे
कलम १२१अ - देशाविरुध्द युध्द पुकारणे
कलम १५३ अ - जात, धर्म समुहात तेढ निर्माण करणे
कलम १०९ - एखाद्याला गुन्ह्याला मदत करणे
यूएपीए कलम १३(१)(बी) - प्रतिबंधित कृत्य करणे
कलम १२०बी - कट रचणे
वादग्रस्त संस्था
‘पीएफआय’ ही अत्यंत वादग्रस्त संस्था आहे. या संस्थेचे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये मोठे ‘हब’ असल्याचे वृत्त काही संकेतस्थळांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना ‘अॅलर्ट’ देण्यात आला आहे. उमेश कोल्हे हत्याप्रकरणी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’चा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आरोप काय?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनाला आर्थिक साह्य करणे, २०२०मध्ये झालेल्या दिल्ली दंगली भडकवणे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दंगली घडविणे, अशा अनेक प्रकरणात ‘पीएफआय’विरोधात ईडी आणि इतर यंत्रणांकडून तपास सुरू होता.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |