सातारा : फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) येथे वर्षापासून टँकर आहे. लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत आहे. त्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आलीय. त्यातच जादा टँकरही मिळाला नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तर गावात पाण्याच्या १४ टाक्या असल्या तरी ठणठणाट आहे. कंत्राटदारांवरील मेहेरबानीसाठीच योजना राबविल्याचा आरोपही होत आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील सासवड गाव. लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला. तर गावाला १४ जूनपासून टँकर सुरू झाला तो आजही बंद नाही. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यातील अनेक टाक्यांत पाणीच कधी पडले नाही, असे ग्रामस्थच सांगतात. तर गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा होतो.
भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजनाही आहेत; पण सध्यातरी याचा काहीच फायदा होत नाही. कालव्याला पाणी आले तरच पेयजल योजना सुरू राहते. गावात पाण्यासाठी आणखी एक टाकी बांधण्यात येत आहे; पण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी उद्भव स्त्रोतच माहीत नाही मग टाक्या आणि योजना करून काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे; तसेच एवढ्या पाणी योजना आणि टाक्या म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदारांचीच मिलीभगत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करू लागलेत.
गावाला सध्या ५५ हजार लिटर पाणी मंजूर आहे. टँकरद्वारे माणसी २० लिटर, मोठ्या जनावरांना ३५ आणि लहान जनावरांना १० लिटर याप्रमाणे पुरवठा होतोय. हे पाणीही पुरेसे होत नाही. यासाठी गावाने एक लाख लिटर पाणी मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांना विकत पाणी घ्यावे लागते. यासाठी खासगी टँकरमधून पाणी घ्यायचे झाल्यास १२०० रुपयांना ५ हजार लिटर पाणी मिळत आहे. त्यातच गावात जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठीही विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |