04:01pm | Jan 22, 2022 |
मुंबई : आयसीसीने टी20 वर्ल्ड कप २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारताला सुपर १२ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सोबत ठेवले आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या लेगसाठी पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचवेळी, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी MCG येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. टी20 विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.
भारत स्पर्धेत एकुण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुध्द, तर दुसरा सामना २७ ऑक्टोबरला ग्रुप ए च्या रनर अप सोबत, तिसरा सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात तर चौथा सामना २ नोव्हेबरला ग्रुप बीच्या विजयी झालेल्या टीम सोबत होणार आहे.
टी20 वर्ल्ड कपचे सामने एडिलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी मध्ये होणार सात ठिकाणी होणार आहेत. टी20 वर्ल्ड कपचा फायनल सामना १३ नोव्हेबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तर सेमी फायनल ९ आणि १० नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि एडिलेड मध्ये होणार आहे.
त्याचबरोबर विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही आठवी आवृत्ती असेल. T20 विश्वचषक २००७ मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. यावेळी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |