सातारा : सध्या राजकारणी लोकांचे सुगीचे दिवस आले आहेत. तरी दुष्काळी पट्ट्यामध्ये विकासाची गंगोत्री आणलेली आहे, असे खोटेनाटे बोलून फोटो सेशन करून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करणार्या सातारा जिल्ह्यातील दोन राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे नाव न घेता स्वतःच्या कर्तबगारीवर निवडणुका जिंकून दाखवाव्यात, असे परखड मत आता सातारकर व्यक्त करू लागलेले आहेत.
राजकारणामध्ये निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची असते. 40-50 वर्षानंतर काहींना घटनात्मक पद व सन्मान मिळालेला आहे. पण अलिकडच्या काळात निष्ठा म्हणजे निसटा, थांबू नका. असे वागून काहीजण (ज्यांचे नाव सुद्धा प्रसिद्ध करावे एवढी इतकी त्यांची उंची नाही) राजकीय पक्ष बदलत आहेत.
राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आल्यानंतर स्वतःच्या खिशातून बिसलेरी बाटली सुद्धा विकत न घेणारी मंडळी आपल्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी दौरा केला आहे, असे भास करून देत आहेत. खरे म्हणजे त्यांच्याच राजकीय पक्षांमध्ये त्यांची ओळख म्हणजे झेड सुरक्षा असलेले राजकीय बॉडीगार्ड अशीच त्यांची पदामुळे ओळख झाली आहे. कारण, राजकीय नेत्यांसोबत आपली छबी दिसली पाहिजे. यासाठी काही फोटोसेशन करणारे रोजंदारीवर त्यांनी ठेवलेले आहेत. हे आता गुपित उघड झालेले आहे.
राजकीय पक्षाची भूमिका जनतेपर्यंत मांडण्यासाठी प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेले आहेत. तसेच आपण कोणती राजकीय भूमिका घ्यावी यासाठी सुद्धा व्यक्तीस्वातंत्र्य आहे. संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. पण, व्यासपीठ दुसर्याचं, माइक दुसर्याचा, परिषद पण दुसर्याची या राजकीय काळू-बाळूचा नाट्य प्रयोग मात्र तोच-तोच सारखा असतो. लोकसभेच्या एवढ्या जागा जिंकणार? विधानसभेच्या एवढ्या जागा जिंकणार? असे मोठे मोठे शब्दप्रयोग करून काही अभ्यासू पत्रकारांचेही मनोरंजन करणारे हे हाडाचे मनोरंजक आहेत. त्यामुळे विरोधी राजकीय पक्ष सुद्धा त्यांचे मत गांभीर्याने घेत नाहीत, हा भाग वेगळा असला तरी सध्या अशा मंडळींची वाढती क्रेझ निष्ठावंत कार्यकर्त्यांची डोकेदुखी ठरू लागलेली आहे.
ज्यांच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही, सोसायटी नाही, संस्था नाही, असे राजकीय सहकार महर्षी अजून किती काळ स्वतःला फसवतील ? हा संशोधनाचा भाग आहे. जनतेने नाकारलेले आहे. मतदारांनी नाकारलेले आहे. हे सांगण्यास मात्र ते कायमचे विसरत आहेत. निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील झाले नाही काम... बेरोजगारांना पण दिला नाही दाम... कसं काय यांच्या सांगण्याने मतदार करणारे मतदान... असे आता स्लोगन झालेले आहे. एवढेच नव्हे तर कानामागून आले आणि तिखट झाले असे काही पदाधिकारी यांनी आपल्या कर्तबगारीवर ओव्हरटेक करून आपले उद्दिष्ट गाठलेले आहे.
या दोन राजकीय पक्षाच्या भूमिकेबाबत विचारधारा वेगळी असली तरी सध्या कमळापेक्षा पाकळ्या मोठ्या झालेल्या आहेत, तर धनुष्याच्या बाणाच्या पाठीमागील बाजू जेवढी आहे. तेवढीच कर्तबगारी असणारी मंडळी स्वतःला राजकीय पक्षाचे चिन्ह जोडत आहेत. याबाबत आता मतदार देखील संताप व्यक्त करीत आहेत, हे सुद्धा लपून राहिलेले नाही.
आगामी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवान हालचाल सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होणे बाकी आहे. परंतु, त्यांच्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रेम करणारे व सध्या भाजपचे काही पदाधिकारी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत. आत्तापर्यंत त्यांनी प्रचाराची नाही पण संपर्काची दुसरी फेरी पूर्ण केलेली आहे. त्यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे.
निवडणुकीपूर्वीच मिठाचा खडा टाकल्यामुळे राजकीय कालवण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमध्ये या दोन राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका ही महायुतीच्या विरोधकांसाठी पावणारा देव ठरलेली आहे. त्यामुळे या दोन जिल्हाध्यक्षांमुळेच महाविकास आघाडीला लोकांचा वाढता पाठिंबा मिळणार असल्याचे मानले जाऊ लागले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |