पाटण : जुलै सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण शहरातील नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. तर काही दुकानदारांचेही यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गोष्टीला सात महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु, शासनाकडून पुरग्रस्त निधी जाहीर होऊनही अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. अशांना सरसकट मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सैनिकी युवा विद्यार्थी/विद्यार्थीनी सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नुकतेच विद्यार्थी संघटनेच्या वतीने पाटण तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी पाटण येथील पुरग्रस्त दुकानदार व महाराष्ट्र राज्य सैनिकी युवा विद्यार्थी, विद्यार्थीनी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विकास कदम, बाळासाहेब देसाई कॉलेजचे यिन अध्यक्ष किशोर लोहार हेही उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, जुलै सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये पाटण शहरातील अनेक नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. तर काही दुकानदारांचेही यामध्ये नुकसान झाले. त्यानंतर राज्य शासनाकडून पुरग्रस्त निधी जाहीर करण्यात आला. परंतु, या गोष्टीला सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही संबंधितांना मदत मिळाली नसून ते अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.
पाटण शहरातील पुरग्रस्त मदत मिळावी, यासाठी पाटण तहसील कार्यालयात अनेकवेळा हेलपाटे मारत असतात. मात्र, तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी त्यांना अटी व शर्तीची अनेक कारणे सांगतात. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे पुरग्रस्तांना शासकीय मदत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पुरग्रस्तांसाठी आलेली मदत निकषांमध्ये अडकली आहे. लोकांना कोरोनासारख्या महामारीमुळे अगोदरच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.
दरम्यान, पाटण शहरातील रहिवाशी व दुकानदारांना प्रशासनाकडून २०१९ मध्ये सरसकट मदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे याही काळात कोणतीही अट न लावता त्यांना तात्काळ मदत देऊन न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री , अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही देण्यात आली आहे.
पूरग्रस्तांच्या भावना समजून घ्या
तहसीलदारांनी पाटणमधील पूरग्रस्तांच्या भावना समजून घ्याव्यात. हा ग्रामीण भाग असून याठिकाणी उद्योग धंदे नसल्याने आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यात कोरोनाच्या संकटामुळे पुरग्रस्त मेटा कुटीला आले आहेत. प्रशासनाने लावलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. तसेच २०१९ प्रमाणे सरसकट मदत मिळावी.
- विकास कदम (अध्यक्ष म.रा.सैनिकी युवा विद्यार्थी/विद्यार्थीनी सामाजिक संघटना)
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |