सातारा : राज्यात महाविकास आघाडीच्या सर्व 48 च्या 48 जागा निश्चित झालेल्या आहेत. सर्व जागांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि डावे पक्ष यांचे एकमत झालेले आहे. काही ठिकाणी चर्चा सुरु आहेत. जिथे चर्चा नाही, तिथे कोणत्या पक्षाकडे मतदार संघ आहे, हे स्पष्ट आहे. सातार्यातील उमेदवारीबाबत माझ्याशी चर्चा सुरु आहे. काल माझी जयंत पाटील यांनी भेट घेवून मते जाणून घेतली. त्यावर मी इच्छुक असलो तरी पण हा निर्णय पवारांनी घ्यायचा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कराड येथे रविवारी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरु होती. त्याच अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबतचा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही. हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडे गेलेला आहे. राज्यातल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागाचा निर्णय झालेला आहे. ज्या पक्षाकडे जागा जाईल त्या पक्षाने आपाआपला उमेदवार ठरवायचा आहे. चर्चा कोणाशी करायची, कोणाशी नाही, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.
पाटण आणि कराडला महाविकास आघाडीचे मेळावे झाले. त्या मेळाव्यात जाहीरपणे आम्ही बोललो आहोतच. सातार्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांनी घ्यायचा आहे. चांगला, सक्षम उमेदवार द्यावा. भाजपाला रोखू शकेल असा. तुम्ही जो उमेदवार द्याल त्याकरता आम्ही कॉंग्रेस पक्ष व इतर पक्ष ताकदीने तुमच्या बाजूने उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.
हातात तुतारी घेणार, की हाताच्या पंजावर लढणार, असे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, मी आज वर्तमानपत्रात वाचले. काहींनी अंदाज वर्तवले आहेत. मी राष्ट्रवादीचे चिन्ह घेईन का?, इतक्या पंचवीस वर्षानंतर मला ते शक्य नाही. मी कॉंग्रेस पक्षाचेच काम करत रहाणार. त्यामध्ये त्यांनी काही पर्याय काढला. मला आदेश दिला, मला सांगितले, सगळ्यांनी आदेश दिला तर माझी तयारी आहे. कसल्याही परिस्थितीत सर्वात सक्षम उमेदवार लढावा, आणि त्याला आपण विजय करावे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, आमच्या कालच्या जयंत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. त्याला काय अर्थ नाही. जे काही सातार्याबद्दल विचारायचे ते जयंत पाटील आणि पवारसाहेबांना विचारा, असे स्पष्टच सांगत ते म्हणाले, तुतारीचा विषय आहे. तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. काही पर्यायच नसल्यास कॉंग्रेसने सातारा लढवावा, असा कोणताही प्रस्ताव अजून राष्ट्रवादीकडून आमच्यापर्यंत आलेला नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल त्यावेळी विचार करु. मात्र सातार्यात जातीयवादी पक्ष नको, असे त्यांनी स्पष्टच सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |