08:48pm | May 12, 2024 |
सातारा : हिंदू धर्म टिकवण्यासाठी त्या धर्माचा खरा अर्थ ब्राह्मण समाजाने वस्तुस्थिती पूर्ण सांगणे गरजेचे आहे. ब्राह्मण समाजाला विनाकारण मनुवादी म्हणून हिणवले जाते. मनुस्मृति हा धर्मग्रंथ नाही तर नियमांचा ग्रंथ आहे. मनुस्मृति ही रचना क्षत्रिय रचना होती. त्याकरिता ब्राह्मण वर्ग दोषी कसा ? ब्राह्मण समाजाने स्वतःची ओळख धर्मशास्त्र समजून घेत पटवली पाहिजे. धर्म वाचवण्यासाठी ब्राह्मण समाजाला मजबूत संघटन उभारावे लागेल, आपली ताकद दाखवावी लागेल, असे कळकळीचे प्रतिपादन अनालायझर चॅनेल चे प्रमुख व जेष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी केले.
ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यावतीने येथील शाहू कला मंदिरामध्ये परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. परम विशिष्ट सेवा मेडल विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, गोविंदशास्त्री जोशी, अनिरुद्ध गुमास्ते, मनीषा पांडे, ब्राह्मण महासंघाचे सहकारी जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके, ऊर्जा फाउंडेशनचे आशुतोष गोखले, दैनिक ऐक्य चे संपादक शैलेंद्र पळणीटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले, मराठी राजधानी शाहूनगरीत बोलताना विशेषत: ब्राह्मण व्यासपीठावरून बोलताना मला विशेष आनंद होत आहे. ब्राह्मण समाजाने आपली ओळख का लपवायची ? ब्राह्मण ही व्यवस्था आहे. जात नाही जी हिंदू धर्माला एका सूत्रात बांधते. ब्राह्मण समाजावर विनाकारण विचित्र आक्षेप केले जातात. त्याचे उत्तर मंथनातून आणि बुद्धीनेच द्यायला पाहिजे. द्विज म्हणजे ब्राह्मण ज्ञान मिळवतो आणि जो ज्ञान देतो तो ब्राह्मण. ब्राह्मण समाजाला विनाकारण मनुवादी म्हणून हिणवले जाते. मनुस्मृती हा नियमांचा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ नाही. मनुस्मृतीची रचना ईश्वाकू वंशातील मनु राजाची होती. त्यासाठी ब्राम्हण समाजाला दोषी कसे धरावे ? मनुची व्यवस्था कर्माधिष्ठीत होती. अट इतकीच होती की कर्मकांडात विचारांची कर्मठता येऊ नये. हिंदू धर्मशास्त्र म्हणजे दुसरे विज्ञान आहे. ब्राह्मण समाजाने स्वतःची ओळख पटवली पाहिजे. ब्राह्मण समाजावर होणार्या आरोपांना बुद्धीनेच उत्तर द्यावे लागेल. हिंदू धर्म वाचवण्यासाठी सर्व ब्राह्मण समाजाला एकत्र येणे गरजेचे आहे,
शूद्र व्यवस्थेला कमी लेखले जाणे हा एक दुसरा आक्षेप आहे. मात्र मनुस्मृतीच्या रचनेप्रमाणे शूद्रांची उत्पत्ती ही मनुष्याच्या पायातून झालेली आहे. मंदिरामध्ये आपण परमेश्वराच्या चरणीच डोके ठेवतो म्हणजे आपण शूद्र व्यवस्थेचा आदरच करतो. मनुस्मृति ग्रंथ योग्य पद्धतीने आणि त्याचा शास्त्रीय अर्थ लावला गेला पाहिजे. केवळ परशुराम जन्माचा घोष करून चालणार नाही, तर हिंदू धर्मशास्त्राचा अर्थ बारकाईने समजून घ्यावा लागेल. ब्रह्मतेज समजावून घेणारेच खरे ब्राह्मण होय. ब्राह्मण समाज एकत्र येऊन त्यांना संघटनेची शक्ती वापरून आपली ताकद दाखवावी लागेल. एक मुखाने नाही तर आपल्यावर होणारा अन्याय अनेक मुखाने बोलायला पाहिजे.
राजकीय वळचणीला जाऊन संघटन मजबूत करू नका. अशी संघटने कलुषित हेतूने नेस्तनाबूत होतात. ब्राह्मण समाजाच्या मुलांमध्ये नैराश्य आहे. त्यांची लग्ने ठरत नाहीत. आपल्या मुलांना व्यवसायाभिमुख बनवा. त्यांना हिंदू धर्माचा खरा अर्थ सांगा. आयुष्य जगण्याची खरीच जाणीव जर ब्राह्मण मुलांना करून दिली तरच त्यांना पुढे वाटचाल सुकर होणार आहे. आम्ही आपला धर्म स्पष्ट केला नाही म्हणून हे आक्षेप आपल्याकडे नोंदवले जातात. हिंदू धर्म टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजाला मजबूतरित्या संघटनात्मक काम करून एकत्र यावे लागेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी आपल्या लष्कर सेवेतील अनेक थरारक आठवणी सांगून एकमुखाने एकसंघपणे पुढे येणारा समाजच प्रगती करतो, हे मुद्देसूदपणे पटवून दिले. ब्राह्मण समाज हा मुखातून प्रकट होतो म्हणून तो व्यवस्थेचा प्रभावी माध्यम ठरतो. ही माध्यमे आपण टिकवली पाहिजेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी महर्षी परशुरामांबद्दल मनोगत व्यक्त केले. गोविंदशास्त्री जोशी, अनिरुद्ध गुमास्ते यांनी परशुराम स्तोत्र, शांतीपाठ पठण, रेणुका अष्टक इत्यादी कार्यक्रम पार पाडले. विशाखा सोहोनी, मृण्मयी मेहंदळे, पृथा टोणपे यांनी शिवतांडव स्तोत्र सादर केले. ऊर्जा फाउंडेशनचे मार्गदर्शक आशुतोष गोखले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांचा शेला, पगडी, स्मृतिचिन्ह, नारळ व कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पांडे यांनी केले, तर परशुराम जन्मोत्सवाची मांडणी ब्राह्मण महासंघ सातारा चे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केली. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करणार्या धैर्या विनोद कुलकर्णी हिचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |