सातारा : कोर्टाने नोंदवलेले प्राथमिक आक्षेप पाहता सरकारने हा आदेश रद्द करत पूर्वीच्याच पद्धतीने शाळांची नोंदणी करून ही प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आप पालक युनियनाचे मुकुंद किर्दत यांनी केली.
सीबीएसई व इतर बोर्डांच्या शाळांमधील प्रवेश निश्चित झाले असून अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने तातडीने आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. कोर्टाने नोंदवलेले प्राथमिक आक्षेप पाहता सरकारने हा आदेश रद्द करत पूर्वीच्याच पद्धतीने शाळांची नोंदणी करून ही प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आप पालक युनियनाचे मुकुंद किर्दत यांनी केली.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर यावर्षी सुरू असलेली प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयामुळे तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरवर्षी खाजगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर लॉटरी काढून मोफत प्रवेश दिला जातो. परंतु, यावेळी फेब्रुवारीमध्ये सरकारने अधिसूचना काढत विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलो मीटर अंतरात सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास खाजगी शाळेत प्रवेश मिळणार नाही, असा निर्बंध घातला. त्या विरोधात न्यायालयात दाद मागितली गेली आंदोलने झाली आणि त्यामुळे आता उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन जुन्या नियमाप्रमाणे खाजगी शाळांमध्ये राखीव जागांवर ऑनलाईन नोंदणी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
मुळात हा नियम बदल काही खाजगी शाळांच्या संचालकांच्या दबावातून आणि मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगममताने आणि आर्थिक हितसंबंधांमधून केला गेला असा गंभीर आरोप करत किर्दत म्हणाले, करोना काळातही शाळा चालू नसताना फी आकारली जाऊ नये, या संदर्भातला अध्यादेश काढला जावा, अशी मांडणी असताना राजकीय नेते आणि संस्थाचालक यांच्या संदर्भात ढिसाळ आदेश काढला गेला. पुढे कोर्टामध्ये तो टिकला नाही. त्यावेळेस सुद्धा तेव्हाचे मंत्री बच्चू कडू यांनी आपली असहायता व्यक्त केली होती. मंत्रालयात काही प्रशासकीय अधिकारी हे खाजगी शाळांच्या नफेखोरीसाठी काम करतात असाही आरोप मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |