08:16pm | Jul 17, 2022 |
पुसेगाव : थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकाधिकारशाही निर्माण करून देशात हुकूमशाही आणायची आहे, असे मत प्रदेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
वास्तविक भारतीय लोकशाहीची रचना प्रतिनिधीक स्वरूपाची आहे. ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा, लोकसभेपर्यंत लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात. त्या निवडलेल्या सदस्यांनी बहुमताने गावच्या सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत आपला प्रतिनिधीनी निवडायचा असतो. त्याच प्रतिनिधीनी बहुमतानी बहुमतानी निर्णय घ्यावेत, अशी रचना आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८आमदार सदस्य म्हणून निवडून देण्याची रचना आहे. ज्यांच्याकडे १४५ सदस्य आमदार असतील ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही प्रतिनिधीक लोकशाही स्वीकारण्याचा आग्रह होता. थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच, नगराध्यक्ष भविष्यात गावाला वेठीस धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु भारतीय जनता पार्टीला सरपंच, नगराध्यक्ष पदाची थेट निवड करून देशात एकाधिकारशाही अर्थात हुकूमशाही आणायची आहे असे मतही रमेश उबाळे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
पैसा, जात, धर्म, दांडगाई तसेच लोकप्रियता आदींच्या बळावर एक व्यक्ती बलवान होऊ नये त्याची एकाधिकारशाही तसेच हुकूमशाही निर्माण होऊ नये असे अभिप्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होते. आपल्या देशातील समाज जाती व्यवस्था, गरीब-श्रीमंत, उच-नीच, जमीनदार-भूमीहीन आदी वर्ग तसेच वर्णाने विभागला आहे. त्यांच्यामध्ये एकसंघपणाची भावना तयार करायची झाल्यास सर्व सज्ञान माणसांना समान अधिकार देण्याचे तत्व स्वीकारण्यात आले. कोणी गावाला वेठीला धरून सरपंच होऊ शकणार नाही. किमान लोकनियुक्त प्रतिनिधीनी बहूमतांनी नेतृत्वाची निवड करावी अशी अपेक्षा आहे. यामूळे लोकशाहीचे पृथ:क्करण होऊन जाईल. मतदारांनी निवडून दिलेल्या सदस्यांचे सभागृहातील महत्व राहण्यासाठी नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडण्याचा अधिकारही त्यांनाचा हवा. एकमताने किंवा बहुमताने सर्व निर्णय घेऊन गावचा तसेच शहराचा विकास करायचा झालेस सरपंच, नगराध्यक्ष तसेच लोकांमधून निवडून आलेल्या सदस्यांमध्येही एकमत असले पाहिजे. म्हणून थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडीचा निर्णय चुकीचा असल्याचेही रमेश उबाळे यांनी स्पष्ट केले आहे.
पैसा, जात, धर्म, दांडगाई तसेच लोकप्रियतेच्या जोरावर एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते. म्हणून लोकशाहीची रचना प्रतिनिधीक स्वरूपाची पाहिजे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते, असे मत रमेश उबाळे यांनी व्यक्त केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |