09:31pm | Feb 10, 2024 |
सातारा : आताची लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. यातूनच देशात लोकशाही राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर भाजप सत्तेवरच येणार नाही,’ असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी केला.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. मखरे बोलत होते. बहुजन मुक्ती पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाल्यानंतर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, प्रदेश सचिव तुषार मोतलिंग, अमोल लोंढे, आर. आर. पाटील, सागर सुतार आदी उपस्थित होते.
ऍड. मखरे म्हणाले, बहुजन मुक्ती पार्टीची देशातील 32 राज्यांमध्ये कार्यकर्त्यांची फळी आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने सातार्यात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आताची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. कारण, देशात जात-धर्माच्या नावाने विशिष्ट लोकांकडून द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यातच भाजपचे सरकार देशात आपली सत्ता येणार नाही म्हणून ईडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. यासाठी आताच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपच्या खासदारांची संख्या शंभरच्या आत येईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत आताच सर्व्हे समोर आणले जात आहेत. 400 हून अधिक जागा मिळणार म्हणून सांगितले जात आहे. कोणाला न विचारताच हे सर्व्हे होत आहेत. यातून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले.
ऍड. मखरे पुढे म्हणाले, आज देशात देवाच्या नावावर मतांचा जोगवा मागण्याचे काम सुरु आहे. मात्र, सूज्ञ मतदार त्याला भुलणार नाहीत. बहुजन मुक्ती पार्टीची इंडिया आघाडीबरोबर बोलणी सुरु आहेत. ही बोलणी जर यशस्वी झाली तर आम्ही इंडिया आघाडीतून ही निवडणूक लढवू आणि यशस्वीरित्या पारही पाडू. मात्र, तसे झाले नाही तर आम्ही स्वबळावरही लोकसभा निवडणूक लढविण्यास सक्षम आहोत. सातारा जिल्ह्याची जबाबदारी तुषार मोतलिंग हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली गोर-गरीबांना न्याय मिळत आहे. वेळ पडली तर ते रस्त्यावर उतरुन आंदोलनाचे हत्यारही उपसत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असल्याचेही मखरे यांनी सांगितले.
यावेळी शिवराज झेंडे, सोमनाथ आवळे, अमित कांबळे, भूषण गायकवाड, अजित नलवडे, निवास झेंडे, अशोक शेडगे, सुनिल कांबळे, सतीश गायकवाड, संदीप आवडे, प्रमोद काळे, सुनिता कसबे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |