03:15pm | Mar 14, 2022 |
पाटण : स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील अनेकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद यामाध्यमातून शिक्षणाची संधी दिली. याच शिक्षणामुळे गावामध्ये, समाजामध्ये प्रगती झाली. पाटण पंचायत समितीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांना दिला गेलेला पुरस्कार शिक्षण क्षेत्रात नवीन उर्जा निर्माण करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
पंचायत समिती येथे सातारा जिल्हा परिषद व लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, प.स. सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, तहसीलदार रमेश पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प.स. सदस्य बबन कांबळे, उज्वला लोहार, रमेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, पाटण तालुका हा भौगोलिक दृष्टीने फार मोठा आहे. या वर्षी पावसात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाशी सातत्याने पाटण तालुका टक्कर देत आहे. अशा कठीण प्रसंगात लोकांना दिलासा देण्याचे काम शासनाकडून झाले आहे. पालकमंत्री या नात्याने पाटण तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषद ग्रामीण भागाला जोडून ठेवतात. पंचायत समिती हा ग्रामीण भाग चालवणारा व शासकीय सेवा देणारा विभाग आहे. येथे जो काम करतो त्याला राजकारणाचा सर्व गाभा समजतो. सन १९८० च्या काळात शिक्षकांनी रस्ते नसताना वाडीवस्तीवर जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. दादांनी तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. आजचा शिक्षक दुर्गम भागात जाऊन मुलांना ज्ञानदान करत आहेत. यापुढेही या शिक्षकांनी तालुक्यातील मुलांचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल, याचा विचार करावा.
ते पुढे म्हणाले, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. महाआघाडी सरकारात आमचेही नेते आहे. या निधीमध्ये कोणी श्रेय घेऊ नका. माथे फिरवण्याचे कोण काम करत असेल; तर त्याकडे लक्ष देऊ नका. अतिवृष्टीचा निधी आहे. गाडीमध्ये पाट्या, नारळ घेऊन फक्त नारळ फोडत बसू नका. हा निधी दुःखासाठी आलेला आहे. याचे भांडवल करु नका, असा टोलाही ना. शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला.
सारंग पाटील म्हणाले, शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. शिक्षण घेतले तर समाज प्रगत होईल. शेतीवरचा भार कमी करायचा असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने समाजात बदल घडतात. शिक्षणाचा समाजामध्ये प्रसार शिक्षक मंडळी करतात. सातारा जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांनी केली. चव्हाण साहेबांच्या संस्कृतीमध्ये घडलेला हा सातारा जिल्हा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सभापती राजाभाऊ शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, पाटण तालुक्यातील ५५ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी केले. तर अर्जुन पाटील यांनी आभार मानले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |