मुंबई : महाराष्ट्रात दिवसाढवळ्या हत्या होतायेत, गोळीबार सुरू आहेत. हे अपयश नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आहे. त्यांनी माफियाराज महाराष्ट्रावर लादलं आहे. हा सूड आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे हे अपयश आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अपयश आहेत. ज्या पद्धतीचे त्यांनी हे सरकार जनतेवर लादलेले आहे. त्यामुळे गावागावत रक्ताचे सडे पडतायेत, लूटमार, हत्या वाढली आहे. मुख्यमंत्र्यांना ताबडतोड काढून याठिकाणी सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा, अशी आक्रमक मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊतांनी आक्रमकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस भाजपाचा कार्यक्रम चाय पे चर्चा करतायेत. परंतु महाराष्ट्राच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा कधी करणार?, ठिकठिकाणी शिंदे गँगचे आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्यांसोबत चाय पे चर्चा करतायेत. हत्या होतायेत. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अपयशी, अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. तुम्हाला केवळ आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रिपद दिले आहेत. राज्यातील जनता तुमच्याकडे राजीनामा मागतेय. या राज्याच्या गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांवर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कारवाई करा असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे. परंतु महाराष्ट्रात गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही हे दुर्दैव आहे. शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर हेसुद्धा नगरसेवक होते. मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांची निर्घृणपणे मुंबई शहरात हत्या झाली आहे. या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा जो नंगानाच पाहायला मिळतोय तो अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हते. गेल्या दीड वर्षात रोज हत्येच्या बातम्या येतायेत. पुण्यात हत्या होते, वकील आढाव दाम्पत्याची हत्या झाली. राज्याचे गृहमंत्री अदृश्य आहेत. ते कुठे आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |