सातारा : सातारा शहरासह तालुक्याच्या काही भागांमध्ये शनिवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा शहर आणि तालुका येथे सुमारे पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पाऊस उघडल्यानंतर पुन्हा उकाडा सुरू झाला. या पावसात बच्चे कंपनीने आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर भिजण्याचा आनंद घेतला.
सातारा शहराबरोबर जिल्ह्याचा पारा मागील चार-पाच दिवसापासून 39 ते 40 अंशाच्या दरम्यान आहे. तीन दिवसांपूर्वी सातारा शहराचे कमाल तापमानाची 39.5 अशी नोंद झाली होती. हे या नवीन वर्षातील उच्चांकी तापमान ठरले.
तीव्र उकाडयाचा सामना सातारा जिल्ह्याला करावा लागत आहे. अजूनही उन्हाळ्याचे दोन महिने बाकी आहेत. असे असताना आत्तापासूनच उन्हाच्या झळांना सातारकर वैतागले आहेत. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास सातारा शहराच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. जवळपास दहा मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. परिणामी उकाडा काही प्रमाणात कमी झाला आणि सातारकरांना दिलासा मिळाला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे माण तालुक्यातील फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. माण तालुक्यातील काळचौंडी येथे बेदाणा भिजून नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. माण, खटाव, फलटण, कोरेगाव येथे रब्बी हंगामातील पीक काढणी सुरू आहे. पिकांची मळणी सुरू आहे. अवकाळी पाऊस झाल्याने या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच उन्हाची तीव्रता आणि त्यात अवकाळीचा मारा यामुळे आंब्याचा हंगामही अडचणीत येऊ लागला असून आंब्याचा पाड कोसळून पडू लागला आहे. परिणामी आंबा उत्पादक धास्तावले आहेत.
कधी उष्णता, कधी गारवा अशा विचित्र वातावरणामुळे सातारा जिल्ह्यात नागरिकांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |