सातारा : मराठी नवीन वर्ष म्हणून एकीकडे शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा समाजकंटकांनी अजिंक्यतारा पेटवला. सायंकाळी चारच्या सुमारास अजिंक्यतारा डोंगराच्या पुर्वेस वणवा लागला आणि काही तासांतच तो वाढत दुसऱ्या टोकापर्यंत गेला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे. पण अंधश्रध्देतून डोंगरला आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डोंगर जाळले तर जनावरांसाठी उत्तम प्रतीचे गवत पुढच्या वर्षी येते असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जरा उन पडू लागले की लोकं डोंगरात येऊन गवत कापून नेतात. आपल्या जनावरांसाठी पुरेशा गवताची तजवीज झाली की उर्वरित डोंगर जाळून टाकण्याची पध्दत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली आहे. याबाबत वनविभागाच्यावतीने वारंवार प्रबोधन करूनही नागरिकांची मानसिकता बदलत नाही.
शहराच्या लगत असलेल्या डोंगरांमध्ये मात्र केवळ गंमतीचा भाग म्हणून वणवा लावला जातो. सहज फिरायला गेलेल्या युवांच्या टोळक्याकडून गंमत म्हणून गवत पेटवले जाते. काही जणांना रात्रीच्यावेळी हा नजारा पहायला आवडत असल्याचेही ते खासगीत सांगतात. युवांच्या या गंमतीचा दुरगामी परिणाम पर्यावरण आणि इथल्या जैवविविधतेवर होत असल्याने इथली जैव साखळीही अडचणीत येणयाची शक्यता वर्तवली जात आहे.
वणवा लावल्याने गवताबरोबरच अनेक छोटे जीव, किडे मुंग्या, पक्षी, त्यांची अंडी आणि सरपटणारे प्राणी जिवानीशी जातात. आग लागल्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी होते. परिणामी डोंगर निसटणे, पाणी पूर्ण वाहून येणे हे धोके निर्माण होतात. यातून मातीचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असे आहे. - सुनिल भोइटे, मानद वन्यजीव रक्षक
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |