12:09pm | Feb 12, 2024 |
उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील सेगमेंटल उड्डाणपूल होत नाही, तोपर्यंत उंब्रज हद्दीत महामार्ग प्राधिकरण विभागाने इतर कोणतेही काम सुरू करू नये. जबरदस्तीने दबाव आणून काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ बंद पाडू, असा इशारा उंब्रज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय ग्रामस्थांनी दिला.
उंब्रज येथे कराडच्या धर्तीवर सेगमेंटल पूल व्हावा, यासाठी उंब्रज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज सौभाग्य मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेत महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी कशा पद्धतीने अन्याय करत आहेत, याचे गाऱ्हाणे मांडले.
उड्डाणपुलासाठी एकत्रित येऊन सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामपंचायत व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने शासन दरबारी मागणी करण्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला तरी बेहत्तर; परंतु आता मागे हटायचे नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सरपंच योगराज जाधव म्हणाले, ‘‘शासनाने दडपशाही करून उंब्रज परिसरातील जनतेची संविधानिक मागणी दाबण्याचा प्रयत्न केल्यास जनतेच्या सोयीसाठीप्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल.
उंब्रजला उड्डाणपुलाऐवजी भराव पूल झाल्याने वीस वर्षांपासून अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भीषण अपघात होऊन अनेक निष्पाप जीव गेले आहेत. सेवा रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते.
एसटी बस स्थानकात येण्यास अडथळा होत आहे. प्रवाशांना धोकादायकरीत्या महामार्गावर बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. उंब्रजसह परिसरातील गावांमधून शाळेसाठी मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.’’
कोणतेही अधिकचे भूसंपादन न करता ४८ मीटरमध्ये सेगमेंटल पूल होत असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण अधिकारी देत आहेत. यासाठी १४७ कोटींचे अंदाजपत्रक सुद्धा मंजुरीसाठी गेले आहे.
मग महामार्ग ठेकेदार तारळी आणि शिवडे येथील नदीवरील पूल पाडण्यासाठी का गडबड करीत आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. २००४ मध्ये प्रशासनाने अशीच भूलथाप मारून बळाचा वापर करून काम पूर्ण केले होते; परंतु गेल्या वीस वर्षांत उंब्रज परिसराने काय यातना भोगल्यात, हे येथील नागरिकांनाच माहिती आहेत, अशीही माहिती सरपंच योगराज जाधव यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, सुधाकर जाधव, प्रशांत पाटील, उमेश काशीद, किसन माळी, नामदेव कांबळे, तसेच माजी उपसरपंच अजित जाधव, सोमनाथ जाधव, विकास जाधव, डॉ. दीपक माने, जयवंत जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, शरद जाधव, अमोल कांबळे, रणजित कदम, संजय पाटील, दिगंबर भिसे, विलास आटोळे, उत्तम कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासन दबावाचा वापर करीत आहे, यामुळेच पत्रकार, ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासमवेत एक बैठक आयोजित केली. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. यामुळे सेगमेंटल पुलाची मागणी कोणत्याही परिस्थितीत लावून धरणार आहे. तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्यास ग्रामस्थ मागे हटणार नाहीत. प्रशासनाने दबाव आणल्यास संविधानिक मार्गाने सर्वपक्षीय लढा तीव्र स्वरूपात उभारला जाणार आहे. - योगराज जाधव, सरपंच उंब्रज
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |