04:40pm | Dec 09, 2022 |
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्वारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजप खासदारांसह नरेंद्र मोदी यांच्या समवेत बैठक झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाने विचारपूर्वक विधान करावे. शिवराय हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची अस्मिता आहे. देशात जसे राष्ट्रपती हे पद मोठे असते तसेच राज्यात राज्यपाल हे पद फार मोठे असते. सध्या भगतसिंह कोश्वारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शिवरायांबद्दल अशा प्रकारचे विधान करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, दि.२३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे याबाबत पत्र लिहिले होते. राष्ट्रपतींनी ते पत्र गृहमंत्रालयाकडे पाठवले आहे. या पत्रात कोणत्याही राज्यात घडणारा एखादा प्रकार इतका वाढू नये की ज्यामुळे थेट निर्माण होईल अशी आपण मागणी केल्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती आहे ती थांबून पुर्ववत शांततापूर्ण वातावरण निर्माण व्हावे, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यपाल भगतसिंह कोश्वारी यांच्यावर कारवाई होणार याची खात्री असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल. या विषयाला राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारांमुळे नाराज झाले आहेत. राज्यपालांनी तोलून मापून बोलायला हवे, अशा प्रकारची विधान वारंवार घडत आहेत. याकडे दुर्लक्ष केले जाईल असे कोणाला वाटू नये. कोणत्याही महापुरुषाबाबत असे घडले चांगले लक्षण नाही, असे सांगत राज्यपालांनी लोकांची माफी मागितली नाही याची खंत आहे असे मतही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमधील राज्यसभेच्या भाजपच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण तिन्ही राज्यांमधील २६ खासदार उपस्थित होते. उर्वरित खासदारांची कालांतराने बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |