03:45pm | Nov 25, 2022 |
दिल्ली : महापालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी भाजप आणि आम आदमी पार्टीमधील वातावरण तापयला लागले आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. जनता त्यांना मारहाण करू शकते, असे ते म्हणाले आहेत. त्यावर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मनोज तिवारीच्या अटकेची मागणी करत भाजपवर मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत सिसोदिया म्हणाले की, मनोज तिवारी म्हणताहेत की, कोणीतरी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करू शकतो. हे घडू शकते हे त्यांना कसे कळले? मनोज तिवारी यांच्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही आज FIR दाखल करू आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार करू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनोज तिवारीला अटक करण्यात यावी, अशी मागणी मनीष सिसोदिया यांनी यावेळी केली.
संजय सिंह हेदेखील संतापले
मनोज तिवारी यांच्या या वक्तव्यावर आपचे खासदार संजय सिंह देखील संतापले आहेत. त्यांनी पलटवार करत भाजपला निवडणूक जिंकता येणार नसल्याचा दावा केला. तसेच, भाजपवाले सीएम केजरीवाल यांना मारण्याचा कट रचत असल्याचा आरोपही केला. मुख्यमंत्र्यांचे डोळे-पाय तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, तरीही निवडणूक आयोग डोळे झाकून बसले आहे, असंही संजय सिंह म्हणाले.
काय म्हणाले होते मनोज तिवारी?
मीडियाशी बोलताना मनोज तिवारी म्हणाले की, कोणीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे डोळे फोडू शकतो आणि त्यांचे पाय तोडू शकतो. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की, केजरीवालांना सुरक्षा द्या, कारण लोक त्यांना कुठेही मारहाण करतील. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल असेही तिवारी म्हणाले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |