11:52am | Apr 01, 2024 |
सातारा : मी कोणताही जल शिक्षण घेऊन पुढे आलेला इंजिनियर किंवा संशोधक नाही, मात्र माझ्या अशिक्षित गुरूंनी दिलेल्या दोन दिवसाच्या विद्येतून पाण्याचे नियोजन पाण्याच्या वाचवण्याची भूमिका मी पुढे मांडत आहे. आज पर्यंत संपूर्ण विश्वातून मला शेकडो पुरस्कार मिळाले मात्र ही पुरस्कार मिळवत असताना सर्वांनीच निसर्ग आणि जलस्रोतांचे रक्षण संरक्षण व पोषण करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे असे उद्गार काढले.
सातारा येथे चिरमुले ट्रस्टचा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते उपस्थित यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत चिरमुले पुरस्कार २०२२ जलसंधारण, पर्यावरण आणि सामाजिक योगदानाबद्दल जलपुरुष- मा. डॉ. राजेंद्रसिंह यांना विकास देशमुख, सचिव, रयत शिक्षण संस्था यांच्या हस्ते सुभाषराव जोशी, अर्बन कुटुंबप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि रु. एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी विश्वस्त डॉ . अनिल पाटील, डॉ. अच्युत गोडबोले, समीर जोशी, दिलीप पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमांत स्व.अण्णासाहेब चिरमुले, कर्मवीर भाऊराव पाटील, अप्पासाहेब पाटिल, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आल्यानंतर ट्रस्ट तर्फे मान्यवरांचे स्वागत वन औषधी रोपे देऊन करण्यात आले. त्यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना दिलीप पाठक म्हणाले की, युनायटेड वेस्टर्न बँकने त्यांचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ 'वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली होती. स्व.अण्णांनी स्वदेशी वस्तू चे दुकान 1906 साली सूरू केले. निर्माण केलेल्या संस्था नीट चालण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सहकारी संस्था उभारल्या, 5 लिमिटेड कंपनी सूरू केल्या. अण्णा यांचे समाजाचे साठी दिलेले योगदान फार मोलाचे होते.
चिरमुले ट्रस्ट तर्फे दरवर्षी तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अर्थशास्त्र आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात अमूल्य सेवा देणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान केला जातो. या वर्षी ट्रस्टने जलपुरुष माननीय डॉ. राजेंद्रसिंह यांना जलसंधारण आणि त्याचे व्यवस्थापन, निसर्ग पुनरुत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल २०२२ च्या चिरमुले पुरस्काराने गौरविण्याचे ठरविले.
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी मनमोहन सिंग, विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, रतन टाटा, राहुल बजाज, डॉ. सी. रंगराजन, गुलजार, डॉ. सायरस पूनावाला आदि आदरणीय व्यक्तिना या पुरस्काराने गौरविले आहे. डॉ. राजेन्द्र सिंह यांची ओळख पाणी फाऊंडेशन चे डॉ. अविनाश पोळ यांनी करुन देताना, राजेन्द्र सिंह यांनी 14 नद्यांचे पुनरुज्जीवन करुन, नदी किती महत्त्वाची आहे याची जाणीव देशवासियांना करुन दिली, चंबळ खोऱ्यात विशेष काम केले असल्याचे सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना राजेंद्रसिंह म्हणाले की, आज आपण नीर, नारी आणि नदी यांना ईश्वर मानण्याचे सोडून नवीन नाती निर्माण करत आहोत. 200 वर्षांपूर्वी साधारण ही नवीन अति निर्माण होण्यात सुरुवात झाली. आणि आपल्या निसर्गातले जलस्त्रोत आपण हरवून बसलो माझ्या अशिक्षित गुरूंनी मला दिलेले मार्गदर्शन त्यातून मी पुढे हे जलसंशोधन व संरक्षण कसे करायचे याची जबाबदारी पार पाडू लागलो तब्बल 49 वर्षे हे मी काम सुरू ठेवले आहे. मॅगसे से पुरस्कारात बाबत माझी निवड करताना भारत सरकारने एक विशेष कमिशन बसवले होते. चार महिने पूर्ण अभ्यास करून माझ्या नावाची निवड झाली आणि मला तो पुरस्कार मिळाला. परंतु, आजचा पुरस्कार हा मला घरचा आणि जवळचा वाटतो. आज बारा विश्वविद्यालयानी मला पुरस्कार दिले. मी पाणी अभ्यासले नाही, तर पाणी जगणे शिकलो. पाण्याचे स्थायी अस्तित्व समाधान शोधण्यासाठी मी कार्यरत आहे. माझी स्वतःची डॉक्टरी पेशा बंद करून गुरूंच्या मार्गदर्शनासाठी पाण्यासाठी काम सुरू केले. आणि गुरूंच्या चांगल्या नुसार औषध व पाण्याच्या शिक्षणाचे काम मी घेत आहे त्यातून मला अनेक सहकारी मिळाले. गुरूंच्या दोन दिवसाच्या निसर्गातील वैज्ञानिक शिक्षणातून मी नव्या पद्धतीचे बांध उभारणी कशी करायची ते बांध कोठे बांधायचे याबाबत शिकलो व आज सर्वांना मार्गदर्शन करत आहे. नैसर्गिक इंजीनियरिंग व प्रकृतीची संवेदना समजावून घेत 17 किलोमीटरचा पायी प्रवास करत मी हे शिक्षण मिळवले पाणी शोधणे व ते टिकवणे याची विद्यामला गुरू कडून मिळाली. लोक जोपर्यंत पंचमहाभूतांचा अभ्यास करून त्यांना देव मानत होते तोपर्यंत कुठलीच कमतरता नव्हती. मात्र, आज आपले विषय बदलले नवीन नाती निर्माण झाली मोजणी पद्धतीमुळे जर चूक झाली तर पूर्णपणे एखादी गोष्ट उलटे होते आणि हे काम शिक्षणाने केले निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात राजेंद्रसिंह यांच्या जलविषयक पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाषराव जोशी यांनी बोलताना मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण दोन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या मान्यवरांचा मी सत्कार करू शकलो याचा मला आनंद होतो डॉक्टर राजेंद्र सिंह यांचे काम हे शासनाचे मदतीशिवाय होत असून ते कोणतेही क्रेडिट न घेता शांतपणे व सातत्याने हे पाण्याचे चिकाटीने काम करत आहेत. त्यासाठी धडपड करत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आजचे संतच म्हणावे लागेल.
प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी आपल्या भाषणात. राजेंद्र सिंह यांच्या कार्याचा गौरव करत राजेंद्रसिंह यांच्या जल योजना बद्दल खूप बोलता येईल जलशिवार यक्त योजनेमध्ये मी त्यांचे मार्गदर्शन घेतले जलसंधारणाचे त्यांचे सुरू असलेले विविध राज्यातील काम हे खरोखरच मोलाचे आहे. ग्राउंड वॉटर टिकवणे आज मोलाचे आहे. आज देशातील 14 नद्या ज्या राजस्थानात 11, महाराष्ट्रात 2 व कर्नाटकातील एक नदीसाठी राजेंद्रसिंह यांनी केलेले काम खूपच गौरवपूर्ण आहे. आज पाण्यासाठी 700 ते 800 फूट खोदायी करून बोअर मारले जाते मात्र तरीसुद्धा पाणी लागत नाही. सध्या राजेंद्र सिंह स्वीडन येथे जलसंधारणाचे काम नेतृत्वाखाली करत आहेत याचा विशेष आनंद वाटतो.
आभार प्रदर्शन ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .मानसी माचवे यांनी केले. कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी व पुरस्कार समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे सह ज्ञानदेव म्हस्के, पाणी फाउंडेशन चे प्रमूख डॉ.अविनाश पोळ, अनिल काटदरे, रमण वेलणकर, डॉ. श्याम बडवे, सौ.मानसी पत्की, बाबुराव शिंदे, बंडूशेठ राजपुरोहित डॉ.धनंजय देवी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |