12:04pm | Sep 27, 2022 |
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सुनावणी झाली. यावेळी पाच सदस्यीय घटनापीठाने शिवसेना पक्षाच्या चिन्हासंदर्भात युक्तिवाद करा, असे आदेश पक्षकारांना दिले. यावर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेत विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या आमदारांचा मुद्दा उपस्थित केला. कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा २० जूनपासून महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत. त्यामुळे प्रथम आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय झाला पाहिजे, असा आग्रह कपिल सिब्बल यांनी धरला.
यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, असा सवाल उपस्थित केला. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा सवाल घटनापीठाने विचारला. यावर कपिल सिब्बल यांनी म्हटले की, हाच मूळ मुद्दा आहे. प्रथम एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे गेले होते, हे स्पष्ट झाले पाहिजे. त्यावर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असे घटनापीठाने म्हटले.
२० जून रोजी या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. २१ जून रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीसाठी व्हीप बजावूनही आमदार आले नाहीत. ते गुवाहाटीला निघून गेले. त्यानंतर २९ जून रोजी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. ही पक्षविरोधी कारवाई असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. व्हीप धुडकावणाऱ्यांवर राजकीय पक्षाला कारवाईचे अधिकार, ते संबंधित पक्षाचे असतात. निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. मात्र पक्षाचं सदस्यत्व आहे की, नाही; हे ठरवणं महत्त्वाचे आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला.
दहाव्या परिशिष्टानुसार पक्षातील फुटीला मान्यत नाही
एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या चिन्हाबाबत याचिका दाखल केल्यानंतरच आताचा पेच निर्माण झाल्याचे घटनापीठाने म्हटले. यावर सिब्बल यांनी पु्न्हा पक्षांतरबंदीचा मुद्दा उपस्थित केला. दहाव्या परिशिष्टानुसार पक्षातील फुटीला मान्यत नाही, असे त्यांनी म्हटले. जर ते मूळ पक्षाचे सदस्य असते आणि अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असेल, जर त्यांनी स्वत:च्या इच्छेने पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असेल, पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केले असेल, हे सर्व १९ जुलैपूर्वी म्हणजे निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी घडले आहे, याकडे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनापीठाने यांनी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेताना विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारच्या कक्षेचा विचार करावा लागेल, असे म्हटले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |