08:37pm | Apr 23, 2024 |
पुसेसावळी : युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेवर असताना माझ्या मागणीनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 11 धरणे बांधली गेली. जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचे मोठे काम त्यामुळे झाले आहे. उर्वरित भागात देखील लवकरच पाणी पोहोचेल, असा विश्वास महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
पुसेसावळी, ता. खटाव येथे जिल्हा परिषद गटाच्या संवाद मेळाव्यात उदयनराजे बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोजदादा घोरपडे, प्रताप शिंदे, जिल्हा परिषदचे माजी सभापती भीमराव पाटील, सुशांत निंबाळकर, भाजप महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष चित्रलेखा माने कदम, विक्रमबाबा कदम, रामकृष्ण वेताळ, मयूर बनसोडे, नवल थोरात, संग्राम राजेभोसले, श्रीकांत पिसाळ, ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ भाग्यवंत, संतोष कणसे, धनाजी पाटील, राजू बर्गे, महेश पाटील, नानासाहेब घाडगे, रामचंद्र जाधव, अनिल पिसाळ, विक्रमबाबा कदम, अकबर बागवान, अमोल कदम, महेश पाटील, हिम्मतराव माने, ज्ञानेश्वर पवार, कुणाल गडांकूश उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, वर्षानुवर्षांच्या निर्विवाद सत्तेमुळे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अहंकार वाढला होता. कुठलेही विकास काम न करता लोक आपल्याला निवडून देतात. दगडाला शेंदूर फासून तो आपण निवडणुकीत उभा केला तरी हे लोक मेंढरासारखी येऊन आपल्याला मतदान करतील, असे कुचेष्टेने ते बोलायचे. त्याच काळात सातार्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न घेऊन मी पाठपुरावा करत होतो. त्याचवेळी युतीचे सरकार राज्याच्या सत्तेवर आले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे गेलो. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी त्यावेळी केली होती.
गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळवली. त्यावेळी साडेबारा कोटींचा निधी या महामंडळाला वर्ग करण्यात आला. त्यावेळी मी सिंचनाचा मुद्दा उपस्थित केला नसता तर आजची जी परिस्थिती पुसेसावळीसह परिसरात पाहायला मिळाली नसती. माझे कर्तव्य मी त्या काळात केले. उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी निवडणुकीत लोकांच्या पाठबळाची गरज असते. या निवडणुकीत तुम्ही हे पाठबळ मला द्याल, याची मला खात्री आहे.
धैर्यशील कदम म्हणाले, कराड उत्तरचे सध्याचे आमदार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुसेसावळी परिसरातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले. हणबरवाडी, धनगरवाडी, अंतवडी धरणांची कामे करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होते. मात्र या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. स्वतः काही करायचं नाही आणि दुसर्याला हसायचे, असा प्रकार विद्यमान आमदारांनी केला. तरीही जनतेच्या पाठबळावर भाजपच्या माध्यमातून आम्ही या परिसरात विकासकामे केली. मागील निवडणुकीत छत्रपती उदयनराजेंचा झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागलेला आहे. काही निवडणुकीत अंडी- मटण देणार्या, पैसे वाटणार्यांना भूलून मते देऊ नका. आता चुकलो तर काळ माफ करणार नाही. या परिसरातून जास्तीचे लीड हे उदयनराजेंना देण्यासाठी सज्ज रहा.
संग्राम राजेभोसले म्हणाले, उदयनराजेंच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात मजबूत करायचे आहेत. गावकी- भावकीसाठी ही निवडणूक नाही, तर देशाचे भवितव्य ठरविण्याची ही लढाई आहे. उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.
डॉ. महेश गुरव म्हणाले, कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण दहा वेळा विचार करतो, चौकशी करतो. आता तर आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. शौचालयाच्या पैशांत घोटाळा करणार्या व्यक्तीला निवडून द्यायचा की तुमच्या भवितव्याचा विचार करणार्या व्यक्तीला, हे प्रत्येकाने ठरवावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी आपल्यापैकी अनेकांच्या पिढ्यांनी बलिदान दिले आहे. आता त्यांचे थेट वारस असलेल्या खासदार उदयनराजेंना लोकसभेत पाठवण्यासाठी मतदान करायचे आहे.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, उदयनमहाराज कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष असताना जिल्ह्यातील धरणे व कालव्यांच्या कामाला गती मिळाली. त्या उलट कॉंग्रेसने या योजना धुळखात ठेवल्या होत्या. 2014 मध्ये नशिबाने युतीचे सरकार सत्तेवर आले, त्यानंतर या योजना मार्गी लावण्याचे काम सुरू केले, आणि पाणी मिळाले. महायुतीचे आमदार, खासदार या परिसरात असतील तर पाण्याचे दुर्भिक्ष निश्चितपणे थांबेल. उदयनराजेंना मते म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे होय.
चिमुकली कडून उदयनराजेना विजयासाठी शुभेच्छा!
पुसेसावळी येथील सुहाना बागवान हिने व्यासपीठावर जाऊन उदयनराजेच्या हातात कॅडबरी देत लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी त्यांना गोड शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |