11:40am | Feb 12, 2024 |
सातारा : सध्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्याचा काळ संपला असून संपत्तीचे प्रदर्शन मांडण्याचे युग सुरु झाले आहे. श्रमसंस्कृतीचा ऱ्हास झाला असून कमी श्रमात जास्त संपत्ती कशी मिळेल याकडे कल आहे. उपजत ज्ञान, शहाणपण संपले आहे. शेती, परंपरा, कुटुंब, चर्चा मागे पडली असून अन्न, वस्त्र, निवारा यानंतर राजकारण ही चौथी गरज झाल्याचे चित्र आहे. कुटुंबव्यवस्था संपली असून लाज, अब्रू, धाक संपलेला आहे. वर्तमानात भूतकाळाची भीती दाखवून भीतीची दुकाने जोमात सुरु आहेत. शिक्षण मूल्याचा ऱ्हास झाला असून एक व्यक्ती म्हणजे समाज झाला आहे त्यामुळे सामान्यांचा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे. तो जर पुन्हा मिळवायचा असेल, सृजनशीलता वाढवायची असेल तर सामान्यातील सामान्य माणसाचं आत्मविश्वास वाढवणारे लिखाण होणे आवश्यक आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कृष्णात खोत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत, मसाप पुणे, शाहुपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यशील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेल्या सातारा साहित्य संमेलनाच्या उदघाटनानिमित्त श्री. खोत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, रवींद्र बेडकिहाळ, शामराव पाटील, किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, विजय बडेकर आणि मान्यवर उपस्थित होते.
खोत पुढे म्हणाले, सातारा ही विचारवंतांची भूमी आहे, त्या भूमीत हे सातारा साहित्य संमेलन होत आहे. सध्या साक्षराला वाचायला लावणे ही एक समस्या निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी पीकातील तण काढ असतो त्याप्रमाणे समाजव्यवस्थेतील तण उपटण्याचे काम लेखक करत असतो. जाग आणण्याचे, समज वाढण्याचे काम जे साहित्य करते ते सरस असते. आपल्याकडे मौखिक परंपरा मोठी आहे. सगळीकडून दिशा अंधारल्या गेल्या तर कलावंत हाच आशा असतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा गावा गावात होणाऱ्या या संमेलनाला महत्व आहे. त्यात सातत्य ठेवण्याचे काम झाले पाहिजे. सध्या कुठेही गेली तरी राजकारणाविषयी चर्चा झाल्याशिवाय चर्चा रंगतच नाही . एखाद्या देशाला संपवायचे असेल तर त्या देशातील शिक्षण मोडल की देश मोडतो आणि सध्या आपण त्या परिस्थितीच्या कडेलोटावर आहोत हे वास्तव खोत यांनी निदर्शनास आणून दिले. काम करुन पैसे मिळवण्यापेक्षा काम न करता पैसे कसे मिळतील हा ट्रेंड आला आहे. प्रत्येक राजकीय नेतृत्वाने आपली खासगी सैन्य निर्माण केले आहे. त्यामुळे विचारवंत, कलावंतांची जबाबदारी वाढली आहे. ठिकठिकाणी भीती विकण्याची मोठे- मोठी दुकान सुरु झाली आहेत. राज्यकर्त्यांकडून वर्तमानावर भूतकाळाचे ओझं लादल जात आहे, असे होणे म्हणजे राज्यकर्त्यांमध्ये दोष असल्याची खात्री पटते. शुध्द अन्न, पाणी, हवा या प्रश्नांऐवजी दुसरेच प्रश्न समोर आणले जात आहेत. यावेळी शेतकरी आत्महत्या का करतात? हे उदाहरणासह सांगितले. साहित्य परंपरेला कर्मकांडाला विरोध करावा लागेल. विचार करायला लावणे साहित्य पाहिजे. यांत्रिकीकणावर कल्पकताच मात करु शकते. मानव हा सुध्दा एक प्राणी आहे हे तो विसरला आहे त्याची जाण त्याला साहित्यिकांनी करुन द्यायला हवी.
यावेळी बोलताना आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सातारा साहित्य संमेलन आयोजित केले त्याबद्दल धन्यवाद दिले. विनोद कुलकर्णी यांनी मर्ढे येथे केलेल्या कार्याचा गौरव केला. साताऱ्यात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आठवणी सांगत पुन्हा एकदा साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रयत्न करु असा विश्वास व्यक्त केला. तसेच मसाप, पुणे शाहुपुरी शाखेला कायम सहकार्य राहिले असे आश्वासन दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी सातारा साहित्य संमेलनाचा आढावा घेतला. तसेच राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांच्या कार्यांबद्दल सांगत राजघराण हीच साताऱ्याची खरी ओळख असल्याचे सांगितले. प्रारंभी राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन झाले. संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा स्वागत करण्यात आले तर कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल तर शामराव पाटील यांचा विशेष सत्कार आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. उदघाटनानंतर झालेल्या कवीसंमेलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी डॉ. राजेंद्र माने, डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, पुरुषोत्तम शेठ, राजकुमार निकम, लांडगे, संजय माने, वजीर नदाफ, रामचंद्र साठे, अनिल जठार, ॲड. चंद्रकांत बेबले, सतीश घोरपडे, अमर बेंद्रे, सचिन सावंत, तुषार महामूलकर, संजय घाडगे, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, अण्णासाहेब राजे भोसले प्रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, साहित्यप्रेमी उपस्थित होते.
ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद : सातारा साहित्य संमेलनाच्या उदघाटनापूर्वी अण्णासाहेब राजे भोसले प्रा. विद्यालयाच्या चिमुकल्यांच्या सहभागाने ग्रंथदिंडी काढण्यात आली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हत्तीखाना शाळा ते न्यू इंग्लिश स्कूलमधील संमेलनस्थळ अशी दिंडी काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थी पारंपारिक वेषात सहभागी झाले होते. 'जय श्रीराम', 'ग्रंथ हेच गुरु', 'मराठी भाषेचा विजय असो' अशा घोषणा देत ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आली. तिथे मान्यवरांनी तिचे स्वागत केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |