12:36pm | Oct 13, 2022 |
पर्थ : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील आपल्या मिशन टी-२० वर्ल्डकपची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. आता या संघाविरुद्ध दुसरा अनऑफिशियल सराव सामना खेळवला जात आहे. हा सामनाही पर्थमध्येच होत आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलला या सामन्यात कर्णधारपद मिळाले आहे. रोहित शर्मा देखील संघात खेळत आहे.
यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशिअल सराव सामनेही खेळायचे आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.
सराव सामन्यात भारताचा अंतिम अकरा संघ
रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
कोहली-राहुल-अश्विन पहिला सामना खेळले नाहीत
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये खेळायला दिले गेले नाही. कोहलीशिवाय सलामीवीर केएल राहुल आणि स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही संघात नव्हते. मात्र या दुसऱ्या अनऑफिशियल सराव सामन्यात राहुल आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे.
टीम इंडियाने पर्थमध्येच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला अनऑफिशियल सराव सामना खेळला. त्या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीवीर हि भूमिका बजावली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने ६ बाद १५८ धावा केल्या. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ८ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या आणि भारताने १३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने २, हर्षल पटेलला १ आणि युजवेंद्र चहलला १ बळी मिळाला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |