कराड (जि. सातारा) : मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. त्यांच्यासमोर त्यासंदर्भातील योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
आमदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फराळाचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘‘दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले; पण पवारांचे घरातल्या घरात नेमकं काय चाललंय, हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचा आहे.’’
तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का? याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘‘अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार, हे निश्चित नाही. ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडीत जो निर्णय होईल त्यावर पुढील दिशा ठरेल.’’
वडेट्टीवारांची भूमिका वैयक्तिक :
काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे. ती काँग्रेस पक्षाची भूमिका नाही, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
विरोधकांची एकजूट गरजेची :
राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे; पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |