खासगी वाटाघाटीतून जमीन देणाऱ्यांना मिळणार प्रकल्पग्रस्त दाखला : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

by Team Satara Today | published on : 05 August 2026


सातारा : राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे स्वेच्छेने आपली जमीन उपलब्ध करून दिलेल्या भूमिधारकांना व त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण व पुनर्वसनाच्या लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा संपूर्ण राज्‍यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.

भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित झालेल्या जमिनींच्या मालकांना विविध सवलती व लाभ उपलब्ध होत होते. मात्र, सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना गती मिळावी, या उद्देशाने अनेक शेतकरी व भूमिधारकांनी खासगी वाटाघाटीद्वारे जमीन दिली असतानाही त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे या भूमिधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन अल्पवयीन मुलींच्या कथित अपहरणाचा बनाव मेढा पोलिसांनी केलेल्या तपासात उघड, भीतीपोटी अपहरणाची बनावट कहाणी रचल्याचे निष्पन्न
पुढील बातमी
"काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' उल्लेखावर, "मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन"- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

संबंधित बातम्या