प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ; जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 03 August 2026


सातारा :  नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याचे स्थैर्य अबाधित राखणेसाठी शासनाने खरीप हंगाम २०२६ साठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवणेस मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन कृषि विभागामार्फत करणेत येत आहे.

तथापि सदर योजनेत शेतक-यांनी सहभागी होणेची अंतिम मुदत दि. ३१ जूलै २०२६ अशी होती. तथापि, राज्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतक-यांकडे अॅग्रीस्टेंक अंतर्गत फार्मर आयडी नसणे, PMFEIY Portal मधील व्यत्यय, आधार व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमि अभिलेख पोर्टलच्या तांत्रिक ससेवेतील व्यत्यय इ. मुळे शेतक-यांचा योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने योजनेत सहभागी होणेसाठी शेतक-यांना विशेष बाब म्हणून  १० ऑगस्ट २०२६ अखेर मुदतवाढीस मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन व ख. कांदा या १० पीकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविणेत येत असून सद्यस्थितीतील अल-निनोच्या पार्श्वभूमिवर अनिश्क्षित हवामानामुळे पीकांच्या वाढीवर व पर्यायने उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने शेतक-यांना पीक विमा योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. असे असूनही आजअखेरचा अहवाल पाहता योजनेत शेतक-यांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येत आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी होणेचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चेन स्नॅचर्सचा सातार्‍यात धुडगूस; दोन महिलांच्या गळ्यातील ऐवज लंपास, सातारा तालुका व सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची संधी; ५ ते १८ ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार

संबंधित बातम्या