8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित

by Team Satara Today | published on : 07 July 2026


मुंबई : जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग. 

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. 

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक, उकाई धरणातून पाच टीएमसी पाणी उचलणार
पुढील बातमी
'सौंदर्यलहरी' पुस्तकाची निर्मिती अभ्यासार्थींसाठी मार्गदर्शक ठरेल - डॉ. सौ. सुचेता परांजपे; कौशिक प्रकाशनच्या 'सौंदर्यलहरी' पुस्तकाचे प्रकाशन

संबंधित बातम्या