ठिबक पाईपच्या कारणावरून वाद विकोपाला; तुकाईवाडी शिवारात शेतकर्‍यावर विळ्याने वार

by Team Satara Today | published on : 15 June 2026


सातारा : तुकाईवाडी शिवारात ठिबक सिंचनाच्या पाईपवरून सुरू झालेल्या वादातून एका शेतकर्‍यावर विळ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप दादासाहेब अवताडे (रा. कोपर्डे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतातील पाईप हलविल्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून संदीप शिरीष वाघ याने शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील विळ्याने अवताडे यांच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पेंट्स दुकानात चौकशीस गेलेल्या व्यक्तीस मारहाण; तिघांवर अदखलपात्र नोंद
पुढील बातमी
मद्यप्राशन करून कार चालवणार्‍याची दुचाकीला धडक; पिता-पुत्री जखमी

संबंधित बातम्या