मान्सूनची जोरदार प्रगती ; भारतीय किनारपट्टीजवळ आला, दोन ते तीन दिवसांत केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर

by Team Satara Today | published on : 23 May 2026


पुणे :  मान्सूनने शनिवारी अरबी समुद्रात जोरदार प्रगती केली. श्रीलंका देश ओलांडून तो भारतीय किनारपट्टीजवळ आला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत तो केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज आहे.

यंदा अल निनो सक्रिय असला, तरीही हिंदी महासागरात अनुकूल स्थिती आहे. तेथील पाण्याचे तापमान वाढल्याने मान्सून वेगाने प्रगती करीत आहे. १६ मे रोजी अंदमानात आलेल्या मान्सूनने आठवडाभरात अंदमान निकोबारसह बंगालचा उपसागर, अरबी समुद्राचा बहुतांश भाग काबीज केला. तो श्रीलंकेच्या मध्यभागातून शनिवारी बराच पुढे सरकला. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत भारतीय किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता ; नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग चेअरमनपदी आमदार रोहित पवार; दक्षिण विभागाच्या चेअरमनपदी कोल्हापूरच्या संगीता प्रशांत पाटील

संबंधित बातम्या