सातारा : शहरातील माची पेठेत राहत असलेल्या शांताराम कोंडिबा खरात (वय 39) यांनी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार दि.30 एप्रिल रोजी शांताराम खरात यांनी राहत्या घरातील तुळईला गळफास घेतला. याची माहिती शांताराम यांचे चुलत भाऊ विजय खरात यांनी सातारा शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता ते मयत झाल्याचे सांगण्यात आले. तपास महिला पोलीस हवालदार पवार करत आहेत.