थायलंडहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत १२ प्रवासी जखमी; अतिशय अवघड स्थितीत विमान सुरक्षित उतरवलं

by Team Satara Today | published on : 05 August 2026


नवी दिल्ली: थायलंडहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात भीषण टर्ब्युलन्सची समस्या निर्माण झाली. यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहे. एअर इंडियाचं विमान थायलंडच्या फुकेतमधून दिल्लीला येत होतं. त्यामुळे विमानात टर्ब्युलन्सची समस्या निर्माण झाली. समस्या इतकी भीषण होती की काही प्रवाशांच्या कानाला, तर काहींच्या मानेला इजा झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत १२ प्रवासी जखमी झाले आहेत. टर्ब्युलन्सच्या दरम्यान विमान आपल्या निश्चित ऍल्टिट्यूडपासून ३०० फूट खाली आलं.

फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाईट AI2379 विमानाला काही वेळासाठी टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. त्यामुळे विमान अचानक खाली आलं. दिल्लीत विमान सुरक्षित उतरवण्यात आलं. सगळ्या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. या विमानात एकूण १३४ प्रवासी होते.

लँडिंगच्या आधी विमान अचानक खाली येऊ लागलं. ते हेलकावे खाऊ लागलं होतं. त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले. विमानात प्रवाशांचा आक्रोश, आरडाओरडा सुरू झाला. या दरम्यान अनेक प्रवासी जखमी झाले. काही वेळासाठी विमानात गोंधळाची स्थिती होती. पण पायलटनं अतिशय अवघड स्थितीत विमान सुरक्षित उतरवलं, अशी माहिती प्रवाशांनी दिली.

एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रवाशाला गंभीर इजा झालेली नाही. काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीचा गरज होती. त्यांना उपचारांसाठी एअर इंडियाच्या विमानतळावरील पथकानं आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विमानतळावरील वैद्यकीय सुविधा केंद्रात नेलं. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा एअर इंडियासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्यासाठी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. सुरक्षेला आमचं प्रथम प्राधान्य आहे. टर्ब्युलन्समुळे दुखापत झालेल्या लोकांना आम्ही सर्वोतोपरी मदत देत आहोत. यासंबंधित अधिकाऱ्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह, आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; लोकशाहीवर घाला घालणाऱ्या गोष्टी घडल्याचा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
पुढील बातमी
सातार्‍यातील यादोगोपाळ पेठेत पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने महिलांनी केले रास्ता रोको आंदोलन

संबंधित बातम्या