सातारा : बालकल्याण समिती येथून दोन मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाल कल्याण समिती, सातारा येथून अज्ञाताने दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.