उन्हाळ्यात दही खाण्याने उत्तम मानले जाते. दही हे थंड असल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो. दही हे आरोग्याचा खजिना मानला जातो. त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो, मात्र काही लोकांना दही खाल्ल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही लोकांसाठी, दही खाल्ल्याने सायनस, ताप, घसा खवखवणे, त्वचेच्या समस्या, अपचन, आम्लता आणि केस गळणे या समस्या निर्माण होतात. आता प्रश्न असा उद्भवतो की दही हे इतके आरोग्यदायी अन्न आहे पण तरीही ते खाल्ल्याने अनेक समस्या कश्या होतात. तुम्हाला माहिती आहेच की जर दही चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर त्यामुळे अनेक समस्या होत असतात.
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी म्हणाले की, दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे मात्र 90 लोक ते चुकीच्या पद्धतीने खातात. दही खाण्याची चुकीची पद्धत आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. जर दही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर दह्यामुळे कोणतीही समस्या तुम्हाला होत नाहीत. दही खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि ते खाताना आपण कोणत्या चुका करत आहोत, याबद्दल तज्ज्ञांकडून आज आपण जाणून घेणार आहोत.
आपण अनेकदा दह्यात साखर किंवा मीठ घालून सेवन करतो. मात्र, चव नसलेले दही खाणे थोडे कठीण असतं. तुम्हाला माहिती आहे की,दह्याची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे मीठ आणि साखर तुम्हाला हानी पोहोचवतं, दह्याला नाही. मीठ आणि साखर या रासायनिक प्रक्रिया होत असते. ज्यामुळे त्यांचे सेवन तुमच्या आरोग्यावर परिणाम करते. जर तुम्ही दह्यात साखर आणि मीठ मिसळले तर दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे तुम्हाला दह्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.
जर तुम्हाला दही गोड करायचे असेल तर तुम्ही त्यात मध घालू शकता. दही गोड करण्यासाठी तुम्ही साखरेचा वापर देखील करू शकता. तुम्ही दह्यात गूळ देखील घालू शकता. जर तुम्हाला दही खारट बनवायचे असेल तर तुम्ही त्यात सैंधव मीठ आणि काळे मीठ घालून ते खाऊ शकता. जर तुम्ही रात्री दही खाल्ले तर ते तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर शरीराचे तापमान कमी होऊ लागतं आणि कफ दोष वाढू लागतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी ते सेवन केल्याने श्लेष्माची समस्या उद्भवू शकतं.
दही, बुंदी आणि काकडी हे दोन्ही परस्परविरोधी आहार आहेत. ज्यांचे शरीरावर दुष्परिणाम होतात. दह्यासोबत तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरात चरबी वाढते, ज्यामुळे दही खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. केळी कधीही दह्यासोबत खाऊ नका. माशासोबत दही खाऊ नका, आंबट फळांसोबत दही खाऊ नका, ते आरोग्याला हानी पोहोचवते.